शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अंतिम श्वासापर्यंत कटिबद्ध – माजी आमदार ॲड.संजय धोटे
राजुरा विधानसभेत शेतकरी संवाद यात्रा.
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- भारत हे कृषीप्रधान राष्ट्र आहे.भारतीय अर्थव्यवस्थेचा शेतकरी हा मुख्य गाभा असुन तो जगाचा पोशिंदा आहे.
शेतकरी जगला तर विश्व जगेल, यासाठी शेतकरी आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे.या विचारांचा अंगिकार करून माजी आमदार ॲड.संजय धोटे यांनी जिवती,कोरपना,गोंडपिंपरी व राजुरा तालुक्यात शेतकरी हितासाठी शेतकरी संवाद यात्रा काढली. नाविण्यपुर्ण शेतीकडे बळिराजा वळला पाहिजे सोबतच शेतकऱ्यांनी पारंपारीकता सोडुन आधुनिक शेतीची कास धरली पाहिजे,याबाबत सदर यात्रेत मार्गदर्शन करण्यात आले.
यात्रेची सुरूवात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या जिवती तालुक्यातील भारी स्थानांवर महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुर्णाकृती पुतळ्याला वंदन करून व संत फुलाजी महाराज यांचे मठात ध्यानधारणा करून दर्शन घेऊन झाली.पुढे टेकामांडवा येथे शेतकरी संवाद करून वारकरी संप्रदायातील महानुभव मंडळिंचा यावेळी सत्कार करण्यात आला.जिवती येथे केंद्रीय ओबिसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले.प्रसिध्द शेतितज्ञ गजानन जाधव यांनी कोरपना येथे शेतकऱ्यांना नाविण्यपुर्ण शेतीचे तंत्रज्ञान दिले.
सदर यात्रेदरम्यान मार्गावरील राजुरा,कावठाला,कोरपना,परसोडा,पारडी,शेनगाव,जिवती,गोंड पिपरी,सोंडो,देवाडा सिध्देश्वर स्थानांवर शेतकरी संवाद व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.केंद्र सरकार तथा राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ माझ्या बळिराजांनी अवश्य घेतला पाहिजे,असे आव्हान हंसराज अहिर यांनी केले.
जिवती तालुक्यातील वन जमिन पट्टे वितरण,मुख्यमंत्री लाडली बहिन योजना,केंद्र सरकार तथा राज्य सरकार यांच्या शेती संदर्भ योजना,सिंचन सुविधा,शेत पिकाला हमीभाव, सहज पीक कर्ज उपलब्धता,नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत,शेतमजुरांना योग्य मोबदला,बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर राहील,असे प्रतिपादन माजी आमदार ॲड.संजय धोटे यांनी शेतकरी संवाद यात्रेदरम्यान केले.१७,१८,१९ जुलै या
तीन दिवसीय यात्रेदरम्यान शेतकरी समस्या,शेति तंत्रज्ञान,रोजगार,वेकोली संदर्भ प्रश्न,कमी खर्चात जास्त उत्पादन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.यात्रेचे संयोजक संजय धोटे,भाजपा नेते खुशालभाऊ बोंडे,माजी जी.प सदस्य अविनाश राऊत,शेती तज्ञ गजानन जाधव,शुभम घुमे ॲग्रोनॉमिस्ट,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतिश धोटे,कार्यक्रम सह संयोजक निलेश ताजणे,अमर बोडलावार,अरुण मस्की,साजिद बियाबानी,सुरेश केंद्रे,केशव गिरमाजी,स्वप्निल अनमुलवार,सुहास माडुरवार,नितीन ढुमणे,किशोर बावणे,नारायण हिवरकर,रामा मोरे,संदिप शेरकी,संजय मुसळे,ओम पवार,संजय पिंपळशेंडे,विजय रणदिवे,महादेव जयस्वाल,संजय पावडे,महादेव एकरे ,शिवाजी शेलोकर,सुनंदा डोंगे,मंजुषा अलमुलवार,दिलीप वांढरे यांचे सह संवाद यात्रेदरम्यान तिनही दिवस प्रमुख नेते मंडळी व कार्यकर्ता वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.
शेतकरी संवाद यात्रेचे संयोजक संजय धोटे व सह संयोजक निलेश ताजणे होते.
शेतकरी संवाद यात्रा मार्गावरील गावांमध्ये शेतकरी बांधवांनी यात्रेचे जोरदार स्वागत केले.