ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

३२ वर्षानंतर वर्ग मित्रांचा स्नेह मिलन सोहळा

जुन्या आठवणीने व भेटीने डोळे पानावले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       वर्ग दहावी 1993 वर्गमित्र लोकमान्य विद्यालय तथा महाविद्यालय भद्रावती चा ३२ वर्षा नंतर स्नेह मिलन सोहळा दिनांक १७ ऑगस्ट २०२५ ला मुरलीधर पाटील गुंडावार लॉन भद्रावती येथे दिवसभराचे सत्रात संपन्न झाला.

       ह्या कार्यक्रमाला पुणे, मुंबई, हैदराबाद, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व भद्रावती येथील ११० विद्यार्थी मित्र-मैत्रिणी तर १२ शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. जुन्या आठवणींना उजाळा देण्याकरिता पंजाबी ढोल सह शाळे पर्यंत मिरवणूक फेरी काढून शिक्षकांसह शाळाभेट करण्यात आली.

शाळेत प्रार्थना व त्यानंतर वर्गात बसून श्री पांढरे सर व श्री पामपट्टीवार सर ह्यांचे छोटे मार्गदर्शन झाले. सर्वांनी जुना काळ अनुभवला. त्यानंतर कार्यक्रम स्थळी म्हणजेच मुरलीधर पाटिल गुंडावार हॉल येथे परत येवुन शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम व मार्गदर्शन झाले त्या मध्ये लोकमान्य विद्यालय भद्रावती चे प्राचार्य मा. धारणे सर, पांढरे सर, जांभुळे सर, दरेकर सर, पामपट्टीवार सर, रावळे सर, मुनेश्वर सर, महाकुलकर सर, पाटील सर, ठेंगणे सर, पबितवार मॅडम, सोनटक्के मॅडम ह्यांचा सत्कार झाला , तसेच विद्यार्थी वर्गमित्र प्रकाश खडकेकर (सुपरिचित – सागर रांगोळीकार) यांनी रांगोळी स्वरूप सेवा दिली , त्यांचा ही सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे त्यावेळी शाळेच्या बाहेर गोळ्या बिस्कीट विकणारे नत्थू भाऊ होकम ह्यांची आठवण ठेवून त्यांना सुद्धा बोलावुन, सत्कार करण्यात आला, शाळे समोर असणारा गोळ्या बिस्कीट चा छोटासा दुकान ठेला साकारून त्यामधे त्यावेळचे सर्व खाद्य साहित्य ठेवण्यात आले, सर्वांनी आस्वाद घेतला.

दिवंगत शिक्षक व विद्यार्थी यांना मौन श्रद्धांजली देण्यात आली.

त्या नंतर मैत्रीचा केक कापन्यात आला, व ग्रुप फोटो काढण्यात आला, जो त्याच दिवशी कार्यक्रमादरम्यान फ्रेम सह तयार करुन सर्व ११० मित्रांना वितरित करण्यात आला.

      त्यांनतर भोजन अवकाश घेऊन विद्यार्थ्यांच्या परीचय सत्रास सुरुवात झाली, कुणी नृत्य सादर केले तर काहींनी गित गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर पदस्थ आहेत, त्या सर्वांनी एकमेकास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, आणि भविष्यात कोणाच्या मुलांना काही मार्गदर्शन लागल्यास ते देऊन योग्य सहकार्य करण्याची भूमिका असल्याचे सर्वांनी बोलून दाखविले. अत्यंत भावनिक प्रसंग घडून आला, कार्यक्रमाचे संचालन मोनाली कुलकर्णी (जानकी भांदककर), तर प्रास्ताविक रितेश उपलंचीवार यांनी केले. कालिदास कोलते यांनी हिशोब सांभाळला, कार्यक्रमाचे यशस्वीते करिता रितेश उपलंचीवार, नरेश लांडगे, कालिदास कोलते, विनोद ठमके, अब्दुल मतीन, राजेश गुंडावार, नितीन मशीदकर, संजय राय, नंदू नक्षिने, मनोज खरवडे, मनीष गोलेच्छा, महादेव टोंगे, प्रताप हांडे, भुजंग पोटे, समीर देशमुख, प्रवीण झाडे, उदय गुंडावार, दिनेश श्रीकुंटवार, अर्चना झाडे, संगीता सातपुते (चिकटे) , रंजना कडुकर (लांडगे), कविता तीतरे (वैद्य) यांनी अथक परिश्रम घेतले तर आभार प्रदर्शन रितेश उपलंचीवार यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये