ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मातंग समाजाचे प्रश्न प्रामुख्याने पावसाळी अधिवेशनात मांडणार – आमदार मनोजभाऊ कायंदे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

मागील अनेक दशकापासून मातंग समाज हा वंचित दुर्बल घटकात जिवन जगत आला आहे. समाजातील विद्यार्थ्यांनी गुणवत्तावर भर देऊन आता उच्च शिक्षणातून संधीचं सोनं केले पाहिजे. यामुळे समाज देखील प्रगतीच्या दिशेने गेल्या शिवाय राहणार नाही.आरक्षण उपवर्गीकरणासह अनेक प्रलंबित प्रश्न मातंग समाजाचे येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात प्रामुख्याने मांडणार असल्याचे प्रतिपादन सिंदखेड राजा मतदार संघाचे युवा आमदार मनोजभाऊ कायंदे यांनी देऊळगाव राजा नगरपरिषद हॉल येथे मातंग युथ फेडरेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थी पालक सोहळा व नवनिर्वाचित आमदार सत्कार सोहळा व करीयर मार्गदर्शन आयोजीत कार्यक्रमाप्रसंगी केले. कार्यक्रमाचे ऊद्घाटक आमदार मनोजभाऊ कायंदे हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भोकरदन मतदार संघाचे आमदार संतोष दानवे यांची उपस्थिती होती.

  तर विशेष मार्गदर्शक हे डॉ. किशोर आंबेगावकर,प्रमुख अतिथी मातंग युथ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विलास भाऊ साबळे,जिल्हा परिषद सदस्य शालीकराम मस्के डॉ. डॉ.रामप्रसाद शेळके, राष्ट्रवादी युवा नेते संतोष खांडेभराड, उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम,दत्तु पंडीत, माजी नगरसेवक नंदन खेडेकर,राजेश इंगळे, साळवे माजी नगरसेवक अजय शिवरकर, राष्ट्रवादी युवा नेते सुनिल लोखंडे, मातंग युथ फेडरेशनचे मिडीया प्रमुख पत्रकार संतोष जाधव उपस्थित होते. यावेळी आमदार संतोष पाटील दानवे यांनी अध्यक्षीय भाषणात आपले विचार मांडतांना सांगितले की, मातंग समाजातील विद्यार्थ्यांना यापुढे शिक्षणासाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू त्याचबरोबर अभ्यासिका, वाचनालय,दर्जेदार अशा व्यायाम शाळा उपलब्ध करून देणारं असल्याचे आमदार दानवे यांनी ग्वाही दिली. मातंग युथ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष अँड विलास साबळे यांनी आरक्षण उपर्गीकरण, गायरान जमिनी,लहुजी साळवे आयोगाची अंमलबजावणी, ग्रामीण भागातील स्मशानभूमिचे प्रश्न यासह समाजावर होणाऱ्या अत्याचार यासह अनेक प्रश्नावर प्रखर असे मत मांडले.याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम यांनी देखील सोशल मिडियाचा होणारा वापर मित्र कसे असावेत..?

विद्यार्थ्यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले. शाहू, फुले, आंबेडकर विचार मंच संस्थापक अध्यक्ष यांनी विचार व्यक्त करताना म्हणाले विद्यार्थ्यांनी व्यसना पासून दूर राहून आपल्या आई वडिलांच्या कष्टाला आकार द्यावा असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अश्विन गायकवाड सर, गजानन खरात, माधव गवळी,अँड सुरेश खंदारे, राजू पाटोळे,विशाल उखंडे, ऋषीं खंदारे, अतिष आवसरमोल, नितीन खंदारे, श्रीधर भालेराव, मनोहर भालेराव, केशव भालेराव, अविनाश दाभाडे, किशोर साळवे,ज्ञानेश्वर नाडे, गजानन खडसे सर,राजू साबळे, चंद्रकांत साबळे, बबन कांबळे, अशोक पाटोळे, सचिन पाटोळे, प्रकाश भाऊ नाडे,रघू निकाळजे, विठ्ठल पाटोळे, एकनाथ दंडे, अजय लोखडे, गजू अंभोरे, रंगनाथ हिवाळे, संजय कांबळे, तुषार खंदारे, विलास थोरात,समाधान ससाने, संजय लोखंडे यांनी प्ररिश्रम घेतले. या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू गोफणे सर यांनी केले तर सुत्रसंचलन प्रदिप पाटोळे यांनी केले. कार्यक्रमासाठी असंख्य विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये