ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांवर प्रशासनाकडून दळपशाहीला सुरुवात

एक सरपंच, दोन माजी सरपंच व अन्य एकास पोलीस ठाण्यात बोलवून नजरबंदी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          दिनांक 17 फेब्रुवारी रोजी निप्पॉन डेंड्रो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सकाळी 6 वाजेपासून त्यांच्या राहत्या घरून पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून त्यांच्यावर काम सुरू होऊ देण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. या मध्ये माजी सरपंच संदिप कुटेमाटे, वासुदेव ठाकरे, तेलवासा-चारागाव सरपंच आकाश जुनघरे आणि प्रवीण सातपुते यांना पोलीस ठाण्यात बोलवून नजरबंदी करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या मागण्याचा कुठलाही विचार न करता प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात हुकूमशाही सुरू करण्यात आली आहे.

कृषिप्रधान देशात प्रशासनाकडून कारखान्याच्या सोयीने काम करण्यात येत असून यामध्ये मोठ्या प्रमाणत आर्थिक देवाण घेवाण झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशा गुंडशाही प्रशासनाच्या दबावाला बळी न पडता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा लढू त्यात जीव गेला तरी चालेल अशी भूमिका अनुप कुटेमाटे आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मांडली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये