ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द

सहा महिन्यांचा शस्त्र साठा निर्मितीचे आदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         पहलगाम हल्ल्यानंतर दोन देशातील तणाव लक्षात घेता भारत सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. युद्धाची स्थिती निर्माण झालीच तर आयुधांची कमतरता पडू नये, यादृष्टीने देशातील सर्व आयुध निर्माणींना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथेही आयुध निर्माणी असून, त्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या कालपासून पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

ज्या कर्मचाऱ्यांच्या सुट्या आधी मंजूर झाल्या, त्यांनाही कामावर तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भद्रावती आयुध निर्माणीत पिनाका नावाचे मिसाईल, 155 – बोफोर्स सेल, 81 mm marter आणि ग्रेनेडस् निर्मिती केली जाते. पुढील सहा महिने पुरेल एवढा शस्त्रसाठा निर्माण करण्याचे उद्दिष्ट इथे देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे भद्रावती आयुध निर्माणी कामाला लागली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये