अनुलोम माध्यमातुन महाकुंभ कलश तिर्थ दर्शन सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकल्पनेतून अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) संस्थेचा जनसेवेसाठी उदय झाला.ग्रामीण भागात सामाजिक तथा धार्मिक संरचनेत संस्था अग्रेसर आहेत. प्रयागराज येथुन आलेल्या पवित्र जल कलशाचे पुजन कार्यक्रम आयोजन भागात होते आहे.
समाजात समरसता भाव जागृत करून एकोपा निर्माण करणे हा यामागील हेतु असुन जिवती,कोरपणा,गोंड पिंपरी व राजुरा तालुक्यातील विविध स्थानांवर धार्मिक आयोजन होते आहे.
जिवती तालुक्यातील आंबेझरी स्थानांवर नुकताच कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रगतशील समाजातील १९ दाम्पत्यांनी कलशाची विधीवत पूजा-अर्चणा करून कलशाचे दर्शन घेतले.येथिल महादेव मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दत्ताभाऊ नंदेवार यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची संकल्पना राजुरा भाग प्रमुख सतिश मुसळे यांनी विशद केली.कार्यक्रमाला दत्ताभाऊ नंदेवार यांनी संबोधित केले.
यावेळी सुनिल गाऊत्रे,विलास कंदलवार, रामराव नंदेवार, रामेश्वर तेलंग, पांडुरंग फड, ओमप्रकाश नंदेवार, रामराव राठोड, हनुमंत नंदेवार, नारायण तेलंग,मारोती कंदलवार, देविदास कोटरंगे यांचेसह अनुलोम वस्ती मित्र,स्थान मित्र परिसरातील मातृशक्ती युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.