ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बिबट्याचा राष्ट्रीय महामार्गावरील इसमावर हल्ला, इसम गंभीर जखमी

पहाटेला फिरायचा जाणे पडले महागात ; वनमंत्र्याचे दुर्लक्ष, ठोस उपाययोजना करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

माणिकचंद मल्लाजी इटकलवार राहणार सावली हा नेहमी प्रमाणे पहाटे  फिरायला गेला होता. फिरायला गेला असता चंद्रपूर- गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० वर राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावलीच्या इन्फिनिटी पार्क समोर पहाटे पाच वाजता बिबट्याने हमला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गावरील घटना असल्याने अपघात झाला असेल असे तर्क- वितर्क शहरातील लोक लावत होते परंतु सावलीतील वनविभागाच्या चमूने प्रत्यक्ष जागेची पाहणी करून आणि जखमीची निशाण बघून वनविभागाने बिबट्याचा हमला असल्याचे निश्चित केले.

नशीब बलवत्तर म्हणून बिबट्याने हमला करुन नेणार इतक्यात एक ट्रक आल्याने बिबट पळून गेला. जखमीला गडचिरोलीला गंभीर अवस्थेत भरती करण्यात आले तिथून गंभीरता लक्षात घेऊन नागपूरला हलविण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यात अशा रोजच घटना घडत आहेत. पूर्वी जंगलात गेल्या नंतरच वन्यप्राण्यांचा हमला मनुष्यावर होत होता आता मात्र नागरिकांच्या घरात तर कधी राष्ट्रीय महामार्गावरील असे घटना घडत असल्याने नागरिकात दहशत निर्माण झाली आहे

वनमंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे असताना या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज असताना वनमंत्री मात्र बघ्याची भूमिका घेतांना दिसत आहेत. आजपर्यंत वाघाने सावली तालुक्यात २३ लोकांचा बळी घेतला गेल्यावर्षीच पाच वर्षाच्या हर्षद कारमेंगे बालकाला अंगणात शौचालयासाठी बसले असता उचलून नेले. आणखी किती बळी गेल्यानंतर वनमंत्री यावर उपाययोजना करणार आहेत असा प्रश्न जनसामान्य नागरिक करीत आहेत.

एखादी घटना घडल्यास वनमंत्री वाघाला पकडण्याचे आदेश देतात व गप्प बसतात मात्र ठोस उपाययोजना आखत नाही किंवा अंमलबजावणी करीत नाहीत. आणखी किती बळी गेल्यानंतर वनमंत्री साहेब अंमलबजवणी करणार आहेत हे वन मंत्र्यांनी सांगाणे असा सुर जनमानसातून निघत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये