बदलापूर दहिवडी कलकत्ता कोल्हापूर येथील घटनेतील नराधमांना भर चौकात फासावर लटकवा व मृत्यूदंड द्या!
"रिपाइं (आंबेडकर) चा एल्गार" : महेंद्र मुनेश्वर
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
बदलापूर येथील घटना ही मानवतेला काळिमा फसणारी आहे अक्षय शिंदे नावाच्या नराधमानेसा डेतीन वर्षाच्या व सहा वर्षाच्या चिमुरड्या मुलींवर अमानुष रित्या जो अतिप्रसंग केला यामध्ये साडेतीन वर्षाच्या त्या चिमुरडी चा उपचारादरम्यान मृत्यू झाला तसेच दहिवडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला ते नात्याला काळीमा फासणारे आहे.तसेच कोल्हापूर येथे घडलेली घटना एका दहा वर्षाच्या मुलीला तिच्यावरती अतिप्रसंग करून तिचा खून करण्यात आला आहे,याच पद्धतीने कोलकाता येतील प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवतीवर अत्याचार करून खून करणार्या संजय रॉय या नराधमांस व दोषी असणाऱ्या सर्वांना भर चौकात फासावर लटकवा व मृत्यूदंड द्या.यासाठी आम्ही २४ ऑगस्ट २०२४ महाविकास आघाडीच्या च्या महाराष्ट्र व वर्धा बंद आंदोलनात सहभागी आहोत.असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे विदर्भ प्रदेश तथा वर्धा जिल्हा अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
राज्याच्या गृह विभागाने व पोलिसांनी लवकरात लवकर याबाबतचे दोषारोप पत्र तयार करावे व संबंधित अशा क्रूर लिंगपिसाट नराधमांना फासावरच नव्हे तर भर चौकात गोळ्या घालण्याचा आदेश द्यावा.यापुढे आमच्या सर्व माय भगिनी,विद्यार्थिनी,तरुणीवर अत्याचार होऊ नये अशी खबरदारी राज्य सरकारने घ्यावी. अन्यथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामे द्यावे.
राज्याचे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार महायुती सरकार हे लिंगपिसाट व नराधम गुंडांना पोसणारे आहे,असेही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वतीने प्रसिद्धी पत्रकातुन महेंद्र मुनेश्वर यांनी म्हटले आहे.