सेवादासनगर येथे वीज पडून तीन बैल ठार
![](https://chandablast.com/wp-content/uploads/2024/05/PhotoCollage_1716462069843-500x470.jpg)
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी संतोष इंद्राळे
जिवती तालुक्यातील सेवादासनगर येथे २२ मे ला सायंकाळी ५.३० च्या दरम्यान अचानक विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरवात होऊन वीज कोसळली. यावेळी तीन बैल जागेवरच ठार झाले मात्र इतर कुठलेही हानी झाली नाही.
सध्या तालुक्यात अधेमधे अवकाळी पावसाचा विजेच्या कडकडाटा सह पावसाचे थैमान सुरू असून २२ मे ला सायंकाळी ५.३० ला सेवादासनगर येथील वामन रेखुजी राठोड, संजय बाबू राठोड, बाबू रामा जाधव यांच्या मालकीचे प्रत्येकी एक बैलवर वीज कोसळून बैल जागीच ठार झाल्याची घटना घडली. काल सेवादासनगर येथे अचानक व विजेच्या कडाडण्याला सुरवात झाली, व पावसा पासून आडोशासाठी थांबलेल्या सुबाभूळ या झाडावर क्षणात वीज कोसळली त्यामुळे तीन बैल जागेवरच ठार झाले, यात वामन रेखुजी राठोड, संजय बाबू राठोड, बाबू रामा जाधव यांच्यावर अस्मानी संकट कोसळले असून मोठे नुकसान झाले आहे.
सदर घटनेची माहिती होताच पशुवैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, सदर ठार झालेल्या बैलांची अंदाजे किंमत दिड लाख रुपये व जनावरांच्या अचानक जाण्यामुळे मोठे नुकसान झाल्याने प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.