ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेल्वे गाडीत पाणी बॉटल चढ्या भावाने विक्री

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर :- रेल्वे गाडीत तसेच स्टेशन परिसरात पाणी बॉटल ची चढ्या भावाने विक्री होत असून प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

       उन्हाळ्यात तापमान वाढत असून प्रवाश्यांचा जीव पाण्याकरीता लाई लाई होते. अश्यातच रेल्वे प्रवाशांना पाणी खरेदी करून प्या लागत आहे. येथील रेल्वे स्टेशन मध्ये थंड पाण्याची सोय नसून त्यांना चढ्या भावाने पाणी बॉटल खरेदी करून प्यावे लागत आहे. रेल्वे विभाग ने रेल्वे स्टेशन तसेच रेल्वे गाडीत रेल नील पाणी बॉटल ची विक्री करण्याची मान्यता दिली आहे.

पण येथील स्टॉल वर रेल नीर पाणी बॉटल ची कमतरता दिसत असून दुसऱ्या कंपनी ची बॉटल विकत आहे. प्रवाशांना १५ रुपये ची बॉटल चढ्या भावाने विकत असल्याची माहिती मिळाली आहे. प्रवाशी गाडी येताच प्रत्येक बोगीत पाणी बॉटल घेऊन चढणारे मुलं हे सुध्दा चढ्या भावाने पाणी बॉटल विक्री करत असून प्रवाश्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

तसेच एक पाणी बॉटल पुरवठा करणारा अनिधिकृत इसम हा गाड्या मधील पेंट्री कार ला पाणी पुरवठा करतो. त्यामुळे रेल्वे विभाग ला सुध्दा आर्थिक भुर्दंड होत आहे. येथील रेल्वे प्रशासन ने लक्ष पुरवून प्रवाश्यांना आर्थिक भुर्दंड पासून वाचवावे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये