ग्रामगीता तत्त्वज्ञान प्रणित सुसंस्कार प्रशिक्षण शिबिराचा समारोपीय कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी रजि. नं. एफ 162 संचालित श्रीगुरुदेव आत्मानुसंधान भू-वैकुंठ अड्याळ टेकडी येथे दिनांक 5 मे ते 20 मे, 2025 या कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांकडून कोणतीही फी न घेता मोफत “ग्रामगीता तत्त्वज्ञान प्रणित सुसंस्कार उन्हाळी प्रशिक्षण शिबिर” घेण्यात आले होते. गुरुपद गुंफा मध्ये छोटे खाणी पार पडलेल्या शिबिराचा समारोप दिनांक 20 मे 2025 रोजी करण्यात आला. नथुजी भुते गुरुजी हे शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तर भाऊसाहेब बऱ्हाटे माजी जिल्हा कृषी अधिकारी, दयारामजी कन्नाके, सयाम गुरुजी, तुंडलवार गुरुजी, विनोद नवघडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा ब्रह्मपुरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
समारोपीय कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुसंस्कार शिबिराचे मौजा येनोडा तालुका पवनी जिल्हा भंडारा येथील नियमित आश्रयदाते, दानदाते श्री विठ्ठलराव पंचभाई यांचे दीर्घ आजाराने दिनांक 13 / 5 / 2025 रोजी अचानक निधन झाल्यामुळे त्यांच्या मृतात्म्यास शांती मिळण्याकरिता मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सुसंस्कार शिबिरामध्ये प्रशिक्षक देवागुरु, चेतन कवाडकर आणि लक्ष्मी जांभुळे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना दिलेल्या प्रशिक्षणावर प्रशिक्षणार्थ्यांचे प्रात्यक्षिक उपस्थित पालकांसमोर करण्यात आले. देशभक्तीपर गीत आदर्श दिनचर्या बाबत ग्रामगीतेतील अध्याय सामूहिकरीत्या प्रशिक्षणार्थींनी म्हणून दाखविले. लाठीकाठी, जुडो कराटे यासोबतच अध्यात्मिक, बौद्धिक ज्ञान, हार्मोनियम, तबलावादन गायनाचे सुद्धा प्रशिक्षण देण्यात आले.
सारंग दाभेकर यांनी योग निसर्गोपचार याबाबत प्रत्यक्षिका द्वारे प्रशिक्षणार्थ्यांना माहिती दिली. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि परम पूज्य तुकाराम जी दादा गीताचार्य संस्थापित अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी संचालित श्री गुरुदेव आत्मानुसंधान भू वैकुंठ अड्याळ टेकडी कडून सर्व प्रशिक्षणार्थ्यांना भगवी टोपी, टी-शर्ट, सामुदायिक प्रार्थना व ध्यानाची पुस्तके तसेच प्रशिक्षणाबाबत ची पुस्तके मोफत देण्यात आली.
समारोपीय कार्यक्रमाचे संचालन रवींद्र उरकुडे यांनी केले. तर 87 मुले मुली शिबिरार्थींनी सहभाग घेतलेल्या शिबिराची संपूर्ण व्यवस्था नाश्ता, भोजन, निवास याबाबतची संपूर्ण व्यवस्था मोरेश्वर उईके, गिरीधर अलबनकर, पवन मगरे, कैलास भोयर, विजय भोयर, ज्योती शिरपूरकर, गोलू कुसनाके, मंगेश लांजेवार, तानबाजी उंबरकर, प्रमोद नवघडे, अक्षय शेंडे, अशोक दुनेदार, बारू ताई ढोंगे, मधुकर मडावी, ज्योती मडावी, माधुरी शेंडे, टापरे, गंडाटे, विजय मडावी व रामकृष्ण उईके यांनी केली.