ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जेव्हा जेव्हा मी जिंकलो, पक्ष जिंकला, पक्षाचे विचार जिंकले

हा लोकशाहीचा विजय व संविधानाचा सन्मान होता - हंसराज अहीर

 चांदा ब्लास्ट

मी चंद्रपूर लोकसभा १९९६ मध्ये पहिल्यांदा जिंकलो. १९९१ च्या निवडणुकीमध्ये भाजपा तिसऱ्या क्रमांकावर होता त्यानंतर एकूण ४ वेळा जिंकलो

      माझ्या मूळ जातीची फक्त १५० परिवार असतील तरी पण पक्षाने मला वारंवार उमेदवारी दिली, ४ वेळा विजय झाला. ही माझ्या पक्षाची व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील जनतेची महानता आहे.

       मी लोकसभा जिंकलो तेव्हा पक्ष जिंकला, पक्षाचे विचार जिंकले, लोकशाहीचा विजय ठरत होता, संविधानाचा सन्मान होत होता. निवडणूक ही विचारांची असते. पुढेही लोकशाहीला हेच अभिप्रेत आहे. मी चारित्र्य सांभाळले, जनतेच्या मताचा आदर केला.

      ही निवडणूक सुद्धा पक्ष जिंकेल. चंद्रपूर भाजपचा गड आहे. दुर्देवाने मागची निवडणूक आम्ही जिंकलो नसलो तरी आमची एकता, एकाग्रता पक्ष बांधणीतून आम्ही विजयाकडे चाललो आहे.

    मिशन महाविजय-२०२४ महाविजय संकल्प ४०० पार, प्रधानमंत्री मोदी जी ३ री बार यात चंद्रपूर राहिलच. आम्ही लढू, आम्ही जिंकू.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये