भाजपाच्या विजयाचा जनतेत जल्लोष
जनमानसाचा प्रचंड विजय, आनंदी माहौल - हंसराज अहीर

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर:- भाजपला तीन राज्यांमध्ये मिळालेला विजय हा मा. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भयमुक्त वातावरण, दूरदर्शी नेतृत्वाखाली, विकास, सुशासन आणि राष्ष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर जनतेने भाजपवर विश्वास व्यक्त केला आहे. मा. प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वात आसाम, पॉण्डेचेरी या ठिकाणी भाजपा पुन्हा सत्तेवर आली आणि पं. बंगाल मधील जुलमी सरकार हटविले. समाज, देशाचे हित जोपासून बंगालच्या मतदारांनी केलेले मत अभिनंदनीय आहे.
हा विजय कार्यकर्त्यांचा अथक परिश्रमांचा आणि जनतेशी असलेल्या मजबूत नात्याचा परिणाम आहे. पुढील काळातही भाजप जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाचा वेग अधिक वाढवण्यासाठी कटिबद्ध राहील.
मी सर्व कार्यकर्ते आणि मतदारांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि हा विजय जनतेला समर्पित करतो.


