ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वादळी पावसामुळे मौजा – किलोनी येथील जल शुद्धीकरण संयंत्र उडाले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती तालुक्यातील, काढ़ोली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मौजा किलोनी येथे दि. 09 में 2025 रोजी रात्रि 12.00 वाजताच्या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह-पावसामुळे मौजा किलोनी येथील DFU फ्लोराईड रिमुव्हल युनिट (जलशुद्धीकरण संयंत्र) संपूर्ण उडून गेल्यामुळे जलशुद्धीकरण संयंत्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रामीण भागात झालेल्या वादळीवऱ्याचा व पावसाचा जोरदार तडाखा बसला असून अनेक झाडे व अनेकांच्या घराच्या छतावरील पत्रे उडून गेल्याने भद्रावती तालुक्यातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये