Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रसंत साहित्यावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

    श्रीगुरुदेव सेवाश्रम नागपूर अंतर्गत राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळ द्वारा आयोजित आणि राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या सहकार्याने येत्या १८ आॅगष्ट २०२४ रोजी (रविवारी) चंद्रपूर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा निःशुल्क आहे.

इयत्ता ८ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी निबंधाचा विषय  आहे’ गाव हा विश्वाचा नकाशा’तर इयत्ता ११ते १२च्या विद्यार्थ्यांसाठी निबंधाचा विषय आहे ‘ ‌ग्रामगीतेतील आदर्श जीवनमुल्ये’.संबंधित विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर एक हजार शब्दांचा निबंध प्रत्यक्ष केंद्रावर येऊन लिहायचा आहे . सदर निबंध स्पर्धा ताडोबा मार्गावरील मातोश्री विद्यालय तुकुम येथे दि.१८/०८/२०२४ (रविवारी) रोजी -दुपारी ११ ते २ या वेळात होणार आहे.

    सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. उत्तम निबंध लिहिणाऱ्यां स्पर्धकांतून खालील प्रमाणे विजेते निवडले जाणार आहे. पारितोषिके प्रत्येक गटास पुढीलप्रमाणे देण्यात येतील.

प्रथम पारितोषिक रु. १५००,  द्वितीय पारितोषिक रु. १०००, प्रोत्साहन पारितोषिक रू. ५०० चे ४ देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळचे अध्यक्ष डॉ. बाळ पदवाड यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय मुख्य आयोजन समितीची सभा घेण्यात आली त्यावेळी समन्वय समितीचे प्रा. नामदेव मोरे घुग्घुस,एड. राजेंद्र जेनेकर राजुरा,डॉ. श्रावण बानासुरे बल्लारपूर,डॉ. धर्मा गावंडे सावली,श्री.नामदेव पिज्दूरकर मुल,श्री.अभय घटे, श्री. बंडू टेकाम,श्री. कार्तिक चरडे,श्री. मनोज ठेंगणे, चंद्रपूर श्री. देवराव कोंडेकर, चंद्रपूर श्रीमती रोहिणी मंगरूळकर कु. रिया पिपरीकर, कु. सरोज साहू,कु. कोमल बावरे, कु. श्रध्दा कुमरे आदींची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये