ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बरांज येथील प्रकल्पग्रस्तांना धनादेश वाटपाची प्रक्रिया सुरू

पहिल्या टप्प्यात ८८ प्रकल्पग्रस्तांना दिला मोबदला ; केपीसीएल व कर्नाटक एम्टा कंपनीची प्रक्रिया

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

              तालुक्यातील बरांज येथील प्रकल्पग्रस्तांना गेल्या कित्येक दिवसापासून शेती, घरे व पुनर्वसनाचा प्रश्न होता तो आता निकाली काढण्यात आला असून पहिल्या टप्प्यात त्यांनी प्रकल्पग्रस्तांना धनादेश वाटप करून प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.

 कर्नाटक पावर कार्पोरेशन व कर्नाटक एमटा या कंपनीतर्फे नियोजन भवन चंद्रपूर येथे बरांज येथील प्रकल्पग्रस्तांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम जिल्हा अधिकारी विनय गोंडा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मुक्का सुदर्शन, पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम, उपविभागीय अधिकारी ज्ञान नंदा लंगडापुरे, तहसीलदार अनिकेत सोनवणे, केपीसीएल अधिकारी शिव प्रसाद, गौरव उपाध्याय, सौगद उपाध्याय उपस्थित होते या कार्यक्रमात केपीसीएल कंपनीने शेत जमीन संपादित केली मात्र त्यांना नोकऱ्या दिल्या नाही अशा चाळीस शेतकऱ्यांना आर्थिक मोबदलेचा धनादेश देण्यात आला तसेच बरांज येथील ४८ घरमालकांना घराचा मोबदल्याचा धनादेश वितरित करण्यात आला असून इतर प्रकल्पग्रस्तांना टप्प्याटप्प्याने धनादेश वितरित करण्यात येणार आहे.

या प्रक्रियेला सुरुवात झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या कार्यक्रमाला कर्नाटक एम्टा चे गजानन जीपकाटे, राजेश वासाडे, प्रवीण ठेंगणे,सुभाष गोहकार, बरांज येथील सरपंच मनीषा ठेंगणे, उपसरपंच राजू डोंगे, आधी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये