ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ते : नागरिकांना पडला प्रश्न?

सुमठाना ते रेल्वे भुयारी पर्यंत चिरादेवी, ढोरवासा, तेलवासा, पिपरी दे. व कोच्ची गावाकडे जाणारा रस्ता देतोय अपघाताला आमंत्रण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

तालुक्यातील सुमठाना ते रेल्वे भुयारी पर्यंत चिरादेवी, ढोरवासा,तेलवासा, पिपरी दे. व कोच्ची गावाकडे जाणारा रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने या खड्ड्या मध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे या रस्त्याने येजा करणाऱ्याला वाहन कसे चालवावे हा प्रश्न पडतो? हा मार्ग ऑर्डन्स फॅक्टरी च्या अंडर मध्ये येत असून या रस्त्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात रहदारी होत असते. रेल्वेची तिसरी लाईन टाकण्याचे काम चालू असून रेल्वेच्या कामाच्या माल वाहतूक गाड्या चालत असतं. परिणामी या रस्त्या चिखलमय झाला.

रस्ता अरूंद असल्याने वाहन घसरण्याचे प्रमाण वाढत आहे. हा रस्ता ऑर्डन्स फॅक्टरी च्या अंडर मध्ये येत असला तरी हा मार्ग तालुक्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून ग्रामीण भागातील नागरिकांना, शाळकरी मुलांना, जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना गाडी वर भल्ले मोठे ओझे घेऊन प्रवास करावा लागत असते.

भद्रावती शहर लागून असल्याने चिरादेवी येथून मोठ्या प्रमाणात शेतकरी मोठ – मोठ्या दूधाची कॅन घेऊन शहराकडे धाव घेत असतात. परंतु या रस्त्यानी भले मोठे खड्डे पडले असल्याने दररोज नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रोज छोटे – मोठे अपघात होत असतात. शाळकरी मुलांना सुद्धा सायकल चा बॅलन्स गेला कि, खड्यातचं पडावं लागतं परिणामी शाळेत न जाता घरी परतावं लागतं. भाजीपाला वाहणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा तोल सांभाळत जावं लागतं. त्यामुळे नागरिकांना या मार्गाने जाताना रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ते हा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष वेधून रस्त्याची डागडुजी तरी करण्यात यावी. अशी खंत सौरभ चामाटे ( चिरादेवी) यांनी व्यक्त केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये