ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्पर्धा परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक – डॉ.नरेशचंद्र काठोडे

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

विद्यार्थ्यांनी जीवनात कठोर परिश्रम घेत शिस्त आणि सातत्य ठेवले तर यश नक्कीच मिळते .ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थी सुद्धा स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतात स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या मध्ये ग्रामीण भागातील व मराठी शाळेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे.त्यामुळे मनात कुठलाही न्यूनगंड न ठेवता विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन अभ्यास केला तर यशाची शिखरे आपण सहज गाठू शकाल.असे प्रतिपादन” मी आय ए एस अधिकारी होणारच” या विषयावर मार्गदर्शन करताना डॉक्टर नरेशचंद्र काठोडे सर (संचालक मिशन आयएएस अकॅडमी अमरावती) यांनी केले.

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे यूपीएससी व एमपीएससी ह्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन डॉ.काठोडे सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे सचिव धनंजय गोरे होते,प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे,सेवानिवृत्त प्राचार्य संजय ठावरी, डॉ हेमंत देशमुख, प्राचार्य डॉ शैलेंद्र देव, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे,होते.

याप्रसंगी प्राचार्य स्मिता चिताडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त प्राचार्य संजय ठावरी यांनी केले, संचालन प्रा प्रदीप परसुटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा विवेक पाल यांनी केले,कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, सहभागी झाले होते,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये