ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केंद्र शासनाच्या “सर्वांसाठी घरे 2022 च्या” धोरणाची अंमलबजावणी करून “प्रधानमंत्री आवास योजने” अंतर्गत मुंबई व ठाणे महानगरात भाडेतत्त्वावर राहणाऱ्या बेघर कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांना हक्काचे घरकुल द्या

अन्यथा 30 एप्रिल रोजी ठाणे टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या आश्रमासमोर धरणे आंदोलन करणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाचा इशारा. 

मुंबई (प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या सर्वांसाठी घरे 2022 च्या धोरणाची अंमलबजावणी करून प्रधानमंत्री आवास योजनेतील तरतुदीनुसार भारत देशात कुठे मालक्याकाचे घर नसलेल्या मुंबई व ठाणे महानगरात भाडेतत्त्वावर राहणाऱ्या बेघर कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांना हक्काचे घरकुल देण्यात यावे या, या मागणीसाठी दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी टेंभी नाका ठाणे येथील धर्मवीर आनंद दिघे यांचे आश्रमासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे व मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

 प्रधानमंत्री आवास योजना अंमलबजावणी कालावधी 2024 ते 2019 च्या कालावधीत मुंबई व ठाणे महानगरातील भाडेकर तत्त्वावर राहणाऱ्या कुटुंबांना हक्काचे घर देण्याबाबत प्रशासकीय यंत्रणाला आपल्या स्तरावरून आदेशित करण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्री मुख्य सचिव गृहनिर्माण उपसचिव मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मुलुंड तहसीलदार बृहन्मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त त्यांना 19 मार्च 2025 रोजी निवेदन देऊन 26 मार्च रोजी हजारो बेघर महिलांना सोबत घेऊन आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केल्यानंतर दिनांक 27 मार्च 2025 रोजी उपसचिव अजित कवडे (गृहनिर्माण ग्विभाग) यांना भाडेतत्त्वावर राहणाऱ्या बेघर कुटुंबांना हक्काचे घरकुल देण्यात यावे यासंबंधी निवेदन देऊन चर्चा केली त्यावेळी त्याने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भारत देशात कुठेही मालकी हक्काचे घर नसलेल्या बेघर कुटुंबाचा फॉर्म भरून जमा करावेत आम्ही त्याचे सर्वेक्षण करणार असे आश्वासन दिल्यानंतर दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्री मुख्य सचिव व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी बांद्रा, मुलुंड तहसीलदार बृहन्मुंबई महानगरपालिका सहायक आयुक्त भांडुप आदिना भाडेतत्त्वावर राहणाऱ्या बेघर कुटुंबाच्या यादीसह निवेदन सादर केलेले आहे. त्वरित त्यांचे सर्वेक्षण करून प्रधान मंत्री आवास योजना ” अंतर्गत महाराष्ट्र शासनाने भाडेतत्त्वावर राहणाऱ्या बेघर कुटुंबांना हक्काचे पक्के घरकुल बांधून देण्यात यावे अशी मागणी मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाचे प्रणते भाई जगदीश कुमार इंगळे मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रभाकर कांबळे मुंबई जिल्हाध्यक्ष वनिता कांबळे मुंबई जिल्हा सचिव कविता निकाळजे व कोषाध्यक्ष कल्पना कांबळे यांनी हजारो बेघर कुटुंबांना सोबत घेऊन केली असल्याचे आमच्या प्रतिनिधीनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये