शिवधुरे रस्ते शेतकऱ्यांसाठी ठरत आहे डोकेदुखी
अनेक प्रकरणे, पोलीस व महसूल विभागाकडे प्रलंबित ; शेतकऱ्यांना तारीख पे तारीख
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
भारत कृषिप्रधान देश असून शेती हा महत्वाचा भाग असला तरी जमिनीची नोंद आणि वहीवटी खाली असलेली जमिनीची मालकी हक्क प्रस्थापित झाले आहे. ग्रामीण भागात शेती हा महत्वाचा घटक असून शेती वहीवाट करीत असताना एका शेतातून दुसऱ्या शेतात जानेयेने करिता कोणतीही अडचण निर्माण होत नव्हती. काळ बदलला आणि शिवधुरे रस्ते काही ठिकाणी पांदण रस्ते निर्माण करण्यात आले.
काही शेतकऱ्यांनी पांदण रस्ते जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत शेतकरी आपलें शेतात जाणे येणे करीत असे. जुन्या काळात शेती बैल जोडी ह्या साधनानी करीत होते पण आता आधुनिक काळात यंत्रे आल्याने ट्रॅक्टर आणि आवाजारे नेत असताना मोठ्या प्रमाणात जागा लागत आहे यामुळे ज्या ठिकाणावून जे शेतकरी आपलें आवागमन करीत होते त्यांनाही विरोध होत आहे. अनेक तक्रारी पोलीस स्टेशन येथे दाखल केल्या जातात पण समेट घडून न आल्यास महसूल विभागाकडे वर्ग केले जातात यामुळे अनेक प्रकरणे तारीख पे तारीख सुरु असल्याचे दिसून येत आहे