चांदा ब्लास्ट : चिमूर
तालुक्यातील शकरपुर येथील अनेक गोर गरीब लाभार्थ्यांना घरकुल मिळाले नसल्याने पडक्या घरात जीव मुठीत टाकून वास्तव्य करीत आहे. परंतु ग्राम पंचायत चे या कडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत शासनाने गरजू घरकुल लाभार्थ्यांना घरकुल देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या वर्षा शेंडे यांच्या नेतृवात गरजू महीलानी बिडीओ राठोड यांना निवेदन देवून केली.
प.स. बिडिओ राठोड यांना वर्षा शेंडे,दुर्गा चावरे, विनोद खेडकर,रामेश्वर सावसाकडे,प्रीती वांढरे,कुंदा सुरकर,उषा शेंडे ,सुरेखा धूर्वे,राणी समर्थ,विमल धुर्वे उपस्थित होते.