सिंदेवाही परिसरात खळबळ : पाने तोडण्यासाठी गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सिंदेवाही आणि परिसर आज एका अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटनेने हादरला आहे. जंगलात पाने तोडण्यासाठी गेलेल्या चार महिलांवर वाघाने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हिंस्त्र हल्ल्यात चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे आणि नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नेहमीप्रमाणे या महिला जंगलात पाने तोडण्याच्या दैनंदिन कामासाठी गेल्या होत्या. सर्वजण कामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. जंगलाचा आसरा आणि हिंस्त्र प्राण्याचा वेग यामुळे महिलांना सावरण्याची संधीच मिळाली नाही आणि वाघाने चौघींनाही जागीच ठार केले. गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि भीती



