ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘शांतता समिती’ची बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आगामी सण आणि उत्सव जिल्ह्यात शांततेत उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. वा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय ‘शांतता समिती’ ची महत्वपूर्ण बैठक पार पडलो. या बैठकीला जिल्हाधिकारी श्रीमती बान्मधी सी., पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार आग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पराग सोमण, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघणतो आणि बर्षेचे नगराध्यक्ष श्री. सुधीर पांगुळ बांधी गुख परिचती होती.

कायदा व सुव्यवस्थाः उत्सवादरम्यान जिल्ह्यात कोठेही गालबोट लागू नये आणि कायदा व सुव्यवस्था अवाचित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून करण्यात भालेल्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. शिस्त व सहकार्य सार्वजनिक मंडळांनी उत्सवाचे आयोजन करताना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, ध्वनी प्रदुषण आणि रहदारीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. सामाजिक सलोखाः वर्धा जिल्ह्याची शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळख कायम राखण्यासाठी सर्व धर्मीय नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सण साजरे करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. नागरी सुविधा नगराध्यक्ष श्री. सुधीर पांगळ यांनी शहरातील स्वच्छता, पथदिवे आणि पाणीपुरवठा यांसारख्या सोयीसुविधांबाबत चर्चा केली.

या बैठकीला वर्धा शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शांतता सनितीचे सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित कार्यकत्यांनी शहरातील विविध सम्स्या मंडल्या, त्यावर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले

“सण हे आनंदाचे प्रतीक आहेत. अफवांवर विश्वास न ठेवता आणि सामाजिक सलोखा राखून सर्वांनी प्रशासनाला सहकार्य कराचे, जेणेकरून उत्सव शांततेत पार पडतील, पोलिस अधीक्षक नां

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये