ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सततच्या पावसाने वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील रस्त्यावरचे पुल गेले वाहून

वाहतूकीला अडथळे निर्माण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

संततधार पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील बेलगांव येथे काल रात्री झालेल्या पावसामुळे नदीवरील पूल पुर्णपणे वाहून गेला या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे तसेच हिंगणघाट तालुक्यातील आलमडोह ते अल्लीपूर मार्ग यशोदा नदी प्रवाहामुळे कालपासून बंद आहे.

पर्यायी मार्ग उपलब्ध आहे आणि तसेच सेलू तालुक्यातील धानोली मेघे ते बेळगाव या गावांना जोडणाऱ्या लोकवर्गणीतून बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूकडील भाग वाहुन गेला आहे.या मार्गावरून फारशी वाहतूक होत नाही या मार्गाचा वापर शेतकरी आणि मजूर मुख्यत्वे करतात पर्यायी मार्ग तीनशे मीटर अंतरावर महामार्गावरून उपलब्ध आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये