ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेनगाव जिवती ते येलापूर मार्गे आदिलाबाद बस सेवा सुरू करण्यासाठी आगार प्रमुखांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रातिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती तालुका हा आदीलाबाद जिल्ह्यापासून सत्तर किलोमीटर अंतरावर आहे हा तालुका मिनी मराठवाडा असून या तालुक्यातील नागरिक हे मूळ नांदेड, लातूर, बीड, परभणी, उदगीर या जिल्ह्यातील व भागातील असल्याने अनेक नागरिकांचे आदीलाबाद पर्यंतचे जाणे येणे हे बसणे असते, आणि त्यानंतर पुढील प्रवास हा साडेबाराच्या रेल्वेने ते मराठवाड्यात जात असतात यासाठी तेलंगणा प्रशासन व एसटी महामंडळाने सर्वे करून तेथील प्रशासनाने या मार्गाची बस सेवा गेल्या अनेक वर्षापासून सुरू केली आहे.

 ही बस सकाळी शेनगाव जिवती वरून सकाळी ६.३० वाजता निघते. या बसला मराठवाड्यात जाण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असल्यामुळे ही बस पूर्णतः भरल्यानंतर बसमध्ये बसण्यासाठी जागा सुद्धा शिल्लक राहत नाही. त्यामुळे या बसची कमाई उत्पन्न हे मोठ्या प्रमाणात असून त्यांचा फायदा हे तेलंगणा सरकारला होत आहे. त्यामुळे  प्रशासनाने राजुरा एसटी महामंडळाने जिवती शेनगाव वरून ही बस सकाळी ८.०० वाजता सुरू केल्यास संपूर्ण तालुक्यातील नागरिक हे तेलंगणा बसच्या ऐवजी महाराष्ट्राच्या बसने आदिलाबादला जातील त्याचा फायदा एसटी महामंडळाला होईल व सरकारला होईल जिवती तालुका हा महाराष्ट्रातील असून मिनी मराठवाडा मराठी माणूस महाराष्ट्रातील जनता आणि तेलंगणा सरकारचा फायदा ही बाब महाराष्ट्र सरकारला अद्यापही कळाले नाही. यासंदर्भातले निवेदन दोनदा आगारप्रमुख राजुरा व जिल्हा स्तरावरही आगार प्रमुखांना दिलेले आहेत.

 परंतु याचे गांभीर्य न घेता  दुर्लक्ष केलेले आहे.त्यामुळे प्रशासनाने ही बस सेवा सुरू केल्यास या बसचे उत्पन्न राजुरा डेपो नागपूर विभागात सगळ्यात मोठ्या प्रमाणात राहील यात तीळ मात्र शंका नाही. परंतु महाराष्ट्राचे प्रशासन हे कासव गतीने चालत असल्यामुळे त्याचाच फायदा घेऊन तेलंगणा प्रशासनाने ही बस सुरू करून उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीनही ऋतूमध्ये ही बस सुरू असते. बस बंद कधीच केल्या जात नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकार व प्रशासनावर महाराष्ट्रातील जनता नागरिक नाराज असून तेलंगणा सरकार व तेथील प्रशासन ही कोणत्याही प्रकारचे काम तातडीने करत असल्यामुळे तालुक्यातील १४ गावे सुद्धा तेलंगणा सरकारकडेच कल असल्याचे दिसून येते. यावरून तेथील प्रशासन किती तत्परतेने काम करते हे दिसून येते.

तेव्हा संबंधित आगार प्रमुखांनी या संदर्भात वरिष्ठांना सूचना देऊन या रस्त्याचे तात्काळ सर्वे करून हा मार्ग सुरू केल्यास मोठ्या प्रमाणात फायदा प्रशासनाला व सरकारला होऊ शकतो. व तालुक्यातील नागरिकांचे जाने,येणे सोयीचे होऊ शकते. या प्रकारचे निवेदन सुग्रीव गोतावळे माजी सभापती व बाजीराव पाटील वल्का माजी संचालक यांनी वरिष्ठ सहाय्यक अरविंद ठमके यांना दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये