अवकाळी पावसाने शेतपिकांचे व फळपिकांचे नुकसान
चौकशी करण्याची खुशाल लोडे यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली तालुक्यात शनिवारी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अंतरगांव निमगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील आंबा, मका, भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन जनकापूर येथील शेतकरी श्री. गजानन धुर्वे यांच्या शेतात दशहरी तसेच गावठी आंब्याची बाग आहे. काल झालेल्या अवकाळी मुसळधार,वादळी वाऱ्याने शेतातील पंधरा आंब्याच्या झाडाचे मोठ्या प्रमाणे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत सापडला आहे. मागील वर्षी पावसाळी हंगामात हातात तोंडाशी आलेला घास घाटे अळी, तुळतुळा रोगाने शेतकऱ्यांचे कमरडे मोडले. त्यातून कसे बसे सावरत असताना शेतकऱ्याच्या आंबा, मका, धान,भाजीपाला पिकांचे अवकाळी ने मोठया प्रमाणात नुकसान झाले. अंतरगांव, निमगाव जिल्हा परिषद क्षेत्रात झालेल्या नुकसानीचे पंचनामें करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी विविध सेवा सह. संस्था अध्यक्ष खुशाल लोडे आणि परिसरातील शेतकऱ्यानी केली आहे.
आधीच शेतकरी कर्जाच्या खाईत असताना आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचा कर्ज माफ करायला तयार नाही. शेतकरी कर्जाची परतफेड कस करणार, आंबा,उन्हाळी धान, मका, भाजीपाला पिका पासून शेतकऱ्याच्या हातात दोन पैसे येणार होते. परंतु नियतीला ते पण मान्य नव्हते, हाता तोंडात आलेला घास कालच्या मुसळधार अवकाळी आणि वादळी वाऱ्याने पिकाचे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत सापडल्या त्यामुळे निशेत आहे.
शेतकऱ्याना शासनानी लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी खुशाल लोडे अध्यक्ष शेतकरी विविध सेवा सह संथा, नुकसानग्रस्त केशव मोहुर्ले, मुकेश वाघरे, उमाकांत धुळसे, अंबादास कोरडे, गजानन धुर्वे, सौ. शोभाताई चुधरी, विठ्ठल मंगर, खुशाल चुधरी, सरपंच डांबजी चौधरी, सुशील डहलकार, वामन दाजगाये, रोहन राऊतकर, सुनील भोयर, दिलीप भोयर, हेमंत धुर्वे, दौलत धुर्वे, टिळक वाढणकर, सदानंद मारभते, आशिष आखाडे, संजय गेडाम, लंकेश लाकडे, प्रशांत मलोडे, अभय दाजगाये, हेमंत वाघरे, लुमाजी भोयर, आदि शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.