वेकोलीचे सुभाष नगर गांधी नगर कॉलनी समस्याच्या विळख्यात!
महिला काँग्रेसच्या वतीने सब एरिया अधिकाऱ्याला निवेदनातून समस्या सोडविण्याची मागणी

चांदा ब्लास्ट
घुग्घूस : शहरातील वेकोलीच्या सुभाष नगर गांधी नगर या वसाहती आजघडीला समस्याचे प्रमुख माहेर घर झाले असून नागरिक त्रस्त आहेत
या समस्या तातळीने सोडविण्यात यावे अशी मागणी चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या महासचिव पदमा त्रिवेणी व त्यांच्या शिष्ठमंडळातील पदाधिकाऱ्यांनी सब एरिया सुधाकर रेड्डी यांना केली आहे.
वेकोलीच्या कॉलनीतील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन मोडकळीस आलेली असून यामधून नागरिकांच्या घरात घाणेरडे पानी येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.
कॉलनीतील नाल्या पूर्णतः तुटलेल्या अवस्थेत असून नागरिकांच्या घरातील सांड पानी रस्त्यावर सर्वत्र पसरतो व तोच पानी नागरिकांच्या घरात शिरतो यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.
कचराकुंडी पूर्णपणे भरल्या असून गेल्या चार महिन्यापासून कचरा कुंडीतील कचरा स्वच्छ करण्यात आला नसल्याने तसेच परिसरात कचरा उचल्याण्यासाठी घंटा गाडी येत नसल्याने ही नागरिक त्रस्त आहेत.
पावसाळ्याला सुरुवात झाली असून साप विंचूवांचा धोखा निर्माण होत असल्यामुळे परिसरातील जंगली झूडपे स्वच्छ करण्यात यावी अशी मागणी शिष्ठमंडळाने केली आहे.
याप्रसंगी महिला जिल्हा सचिव दुर्गा पाटील, ज्येष्ठ नेत्या संध्या मंडल, जोया शेख,लक्ष्मी गोदारी, बोधमा इरला व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.