समर्थ कृषी महाविद्यालयात जागतिक जल दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्न समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा व भारतीय जैन संघटना, शाखा देऊळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयांमध्ये जागतिक जल दिवस anjuli साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुण कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नितीन मेहेत्रे, प्राचार्य तसेच सन्मती जैन, राज्य कार्यकारणी सदस्य, भारतीय जैन संघटना दे. राजा मनीष कोठेकर, विदर्भ सचिव, भारतीय जैन संघटना, दे. राजा, पियुष खडकपूरकर , चॅप्टर अध्यक्ष, भारतीय जैन संघटना, दे राजा प्रा सचिन सोळंकी, प्रा किरण ठाकरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणात प्रा सचिन सोळंकी यांनी जलसंवर्धन व त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनीष कोठेकर यांनी पाण्याची बचत करावी याबाबत विद्यार्थ्यांना आवाहन केले.
तसेच सन्मती जैन यांनी पाणीबचत विचारात नसून आचरनात सुद्धा आणले पाहिजे भविष्यात जर आपल्या सर्वांना जल युद्धाचा सामना करावयाचा नसेल तर आतापासूनच सर्वांनी जल क्रांती अधिक प्रभावी पने करून पावसाच्या पाण्याचा थेंब अन थेंब जमिनीत जिरवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले, सोबतच पाणी आडवा पाणी जिरवा साठी ठिकठिकाणी बंधारे बांधल्यास फार मोठया प्रमाणात पाणी जमिनीमध्ये जिरण्यास मदत होणार आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे यांनी पाण्याचे महत्व, पाण्याच्या समस्या तसेच भारतीय जैन संघटना anjuli यांनी राबवलेली पाणी वाचवण्याचे विविध उपक्रमाबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा बनकर तर आभार प्रदर्शन ऋतुजा वाघ या रासेयो स्वयंसेविकांनी केले. सदर कार्यक्रमास प्रा चगदळे, प्रा वानखेडे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी पाण्याच्या बचतीसाठी शपथ घेतली.