ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
ताडोबाच्या जंगलात राजस्थानचा ‘जटायू’

चांदा ब्लास्ट
दि. 21 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता ताडोबातील झरी परिसरातील 8 जटायुंना जंगलात सोडण्यात येणार आहे.
ताडोबाच्या जंगलात सोडण्यात येणारी गिधाडे राजस्थानमधून येत आहेत. गिधाडांचे खाद्य हे मृत प्राणी आहे, म्हणून त्यांना निसर्गाचे सफाई कर्मचारी असेही म्हणतात.
ताडोबा-चंद्रपूरच्या जंगलात त्यांना अन्न सहज उपलब्ध होईल आणि त्यांचा अधिवास आमच्या जंगलात पुन्हा निर्माण होईल. जैवविविधता विकासाच्या दृष्टिकोनातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवारजी यांनी रामायणाचे प्रतीक असलेल्या जटायूला मुक्त करण्याचा संकल्प घेतला आहे.