पाण्याच्या शोधात.. काळवीट (हरीण) विहिरीत पडले..
तीन तासाच्या अथक परिश्रमाने वन विभाग आणि स्थानिकांच्या मदतीने दिले जीवदान..

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
यावर्षीच्या उन्हाळ्यात तापमानात प्रचंड वाढ झाली असून जंगलातील विविध प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती वाढली असून पाणवट्याकडे जंगलातील विविध प्राणी येत आहे पाण्यासाठी प्राण्यांचा मानवी वस्त्या कडे धाव घेत आहे. दिनांक 27 च्या रात्री तालुक्यातील तुळजापूर परिसरात गजानन तिडके, पत्रकार यांच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये एक काळवीट ( हरीण ) पडलेले आढळले त्यांनी तात्काळ याची माहिती वन विभागाला देऊन तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर सदर हरणीला जीवदान देण्यात आले. सविस्तर वृत्त असे की. यावर्षीच्या उन्हाळ्यात तापमानात प्रचंड वाढ झाली असून मानवासह – जंगलातील प्राण्यांची अक्षरशः जीवाची लाही- लाही होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती वाढलेली आहे. पाण्याच्या शोधात रात्रभर हे वन्य प्राणी भटकत असतात.
अशाच प्रकारे तालुक्यातील तुळजापूर परिसरात असलेल्या गजानन तिडके पत्रकार यांच्या शेतामध्ये असलेल्या साठ फूट विहिरीमध्ये एक काळवीट (हरीण) पडलेले आढळले नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतामध्ये आज सकाळी दहा वाजे दरम्यान असलेल्या विहिरीकडे काही कामानिमित्त ते गेले असता सदर काळवीट विहिरीत पडलेले त्यांना दिसले. त्यांनी तात्काळ वन विभागाला याची माहिती दिली. पाण्यामधून जिवंत हरीण वर काढणे म्हणजेच मोठ्या जिकरीचे काम होते. परंतु वन विभाग कर्मचारी आणि स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने तीन तासाच्या अथक परिश्रमाने वन विभाग कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने वर काढून त्याला जीवदान देण्यात आले.
*विहिरीमध्ये सदर हरणाला सोडले खाद्य* विहिरीमध्ये पडलेले हरीण जीवाच्या आकांताने तडफडत असताना गजानन तिडके पत्रकार यांनी क्षणाचाही विलंब न करता शेतामध्ये असलेला हिरवा भाजीपाला त्यामध्ये हिरवी कोबी आणि इतर खाद्य दोरीच्या साह्याने विहिरीमध्ये सोडले असता सदर खाद्य काळवीटाने खाल्ले तोपर्यंत वन विभागाची टीम घटनास्थळी आली. विहिरीमध्ये असलेले पाणी आणि खडकाळ भाग यामुळे जिवंत वर काढणे ही अतिशय जिकरीची बाब असताना स्थानिक नागरिक शेतकरी यांच्या मदतीने सदर हरणाला वर काढले. वर काढल्यानंतर सदर काळवीट (हरीण) जंगलाकडे धाव घेतली.
पाण्याचे दुर्भश्य पाहता तिडके यांनी विहिरी भोवती नैसर्गिक पानवठा तयार केला आणि त्यामध्ये पाणी सोडले आजच्या या टीम मध्ये राजेंद्र शेळके वनरक्षक, कारभारी घोंगे वनमजूर, सतीश तिडके, यश तिडके, आदित्य निंबाळकर, रोहित खरात, ज्ञानेश्वर कोल्हे,कैलास गंडे, अवचित कोल्हे, यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी मोलाची मदत केली