डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून स्थापना झालेल्या गायरान पडिक जमिनीची चळवळ जिवंत ठेवण्याचा संकल्प करा
बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी केले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना आव्हान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे अवचित्य साधून बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भाई जगदीश कुमार इंगळे यांनी अभिवादन केले याप्रसंगी दलित आदिवासी भूमिहीन ओबीसी भटके विभक्त आणि हजारो वंचित कुटुंबांनी शासकीय जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण करून परिवाराच्या उपजीविकेचे साधन बनविले असताना अशाप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गायरान जमीनीच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती
सदर जमिनीचा मालकी हक्क यातून येणारी आर्थिक प्रगती आणि त्यातून मिळणारा सामाजिक सन्मान अपेक्षित होता यांच्या प्रेरणेने भूमिहीन वंचित घटकांना आर्थिक आणि राजकीय स्थैर्य मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार धारेला अभिप्रेत असलेली चळवळ जिवंत ठेवने ही आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्याची जबाबदारी असून काळाची गरज असल्याचे भाई जगदीश कुमार इंगळे यांनी अभिवादन प्रसंगी सांगत असताना हा लढा संवर्णाच्या जमिनी घेण्याचा घेण्याचा नाही तर भूमीहिनाना स्थिरस्थावर होण्यासाठी सन्मान मिळून देण्यासाठी पडीत जमिनीवर हक्क देण्याचा आहे एक दोन एकराच्या त्यांची आर्थिक भरभराट होणार नसली तरी वन जमीन धारकांना एक प्रकारचा सामाजिक स्थैर्य आणि सन्मान मिळू शकतो त्यामुळे सरकारने याबाबत कायदा करून गायरान धारकांच्या नावे जमिनी करण्याचा कायदा करण्याची गरज आहे कायदा असेल तर आम्ही भांडू शकू कायदा असेल तर लढू शकू निवळशासन निर्णयाचा बळावर आम्हाला काही करता येणार नाही म्हणून सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी डॉ बाबासाहेब यांना अभिप्रेत असलेला लढा जिवंत करावा असे आवाहन भाई जगदीश कुमार इंगळे यांनी केले याप्रसंगी सन्मान समाज भूषण पुरस्कार प्राप्त राजू धोगडे आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते सरकार इंगोले उपस्थित होते