ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुस शहरात पाणीटंचाई : प्रशासनाची निष्काळजीपणा की राजकीय डावपेच?

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील घुग्घुस शहरात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना दोन ते चार दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. स्थानिक नागरिकांचे आरोप आहेत की, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कार्यशैलीमुळे ही समस्या अधिक तीव्र होत आहे.

प्रशासनाचा हलगर्जीपणा: कारणे आणि परिणाम

घुग्घुस शहरात कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी येथे स्थायी स्वरूपात राहत नाहीत. ते दररोज १८ ते ३० किलोमीटर दूरून प्रवास करतात. त्यामुळे त्यांना येथील समस्यांची तीव्रता जाणवत नाही. नागरिकांच्या अडचणींवर योग्य उपाय न काढता प्रशासनाकडून केवळ आश्वासनांचीच पेरणी केली जात आहे.

शहरातील तीन प्रमुख भाग आणि पाणीटंचाई

१. WCL क्षेत्र

या भागात गांधी नगर, सुभाष नगर, इंदिरा नगर, राजीव कॉलनी, रामनगर, शिव नगर, बंगाली कॅम्प, गोपाल नगर, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, शालिग्राम नगर यांचा समावेश होतो.

WCL च्या लीजवर असलेल्या जमिनींमुळे नगरपरिषद काही सुविधा पुरवू शकत नाही.

WCL स्वतःच्या कर्मचाऱ्यांना प्राथमिकता देत नाही, कारण अनधिकृत वसाहती आणि बाहेरून आलेल्या लोकांच्या वाढत्या संख्येमुळे पाणीपुरवठ्यावर अतिरिक्त ताण येत आहे.

कामगार वसाहतीत पाणीपुरवठा तीन ते चार दिवसांच्या अंतराने होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

२. घुग्घुस बस्ती

हा भाग झोपडपट्टीसारखा आहे, ज्यामध्ये अमराई वॉर्ड, तिलक नगर, उड़िया मोहल्ला, नवा दोन नंबर, श्रीराम वॉर्ड, पंचशील एरिया, विद्या टॉकीज एरिया, बँक ऑफ इंडिया परिसर येतो.

बाहेरून आलेल्या लोकसंख्येमुळे संसाधनांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

NOC नसल्याने अनेक मूलभूत सुविधांमध्ये अडथळे येत आहेत.

या भागातही पाणीटंचाई तीव्र असून नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत.

३. फॉश एरिया (वॉर्ड क्रमांक ६)

हा भाग तुलनेने अधिक विकसित मानला जातो, परंतु येथेही अनेक समस्या कायम आहेत.

काही भागांमध्ये अद्याप नळजोडणी, रस्ते आणि अन्य सुविधा नाहीत.

येथील बोरवेल कोरडे पडले आहेत, त्यामुळे नागरिकांना टँकर आणि नगरपरिषदेच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

उन्हाळ्यात दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे.

नागरिकांचे प्रश्न: प्रशासनाकडून तोडगा की राजकीय खेळ?

घुग्घुस शहरातील पाणीटंचाई हा नवा प्रश्न नाही, मात्र प्रशासनाकडून यावर ठोस उपाययोजना केली जात नाही. नगरपरिषद आणि जलविभागाच्या अपयशी धोरणांमुळे नागरिक अडचणीत आले आहेत. स्थानिक नेत्यांची निष्क्रियताही या समस्येला खतपाणी घालत आहे.

आता पाहावे लागेल की, प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या पाणीटंचाईवर उपाय शोधतात की नागरिकांना राजकीय डावपेचांचा बळी बनवून त्यांना असेच संकटात ठेवले जाते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये