ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्प कर्मचाऱ्यांमुळे भद्रावती तहसील कार्यालयाचे काम प्रभावीत

नागरीकांना मनस्ताप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         अल्प असलेल्या कर्मचारी वर्गामुळे भद्रावती तहसील कार्यालयातील कामकाज प्रभावीत झाले आहे.कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरीक्त ताण आल्याने दैनंदीन तथा लोकोपयोगी कामे हातावेगळी करण्यास विलंब लागत असल्याने सर्वसामान्य नागरीकांना याचा मनस्ताप सहण करावा लागत आहे.ही गंभीर बाब लक्षात घेऊन शासनाने येथे पुरेसे कर्मचारी ऊपलब्ध करुन द्यावे अशी मागणी नागरीकांकडून केल्या जात आहे.भद्रावती तहसील कार्यालयात एकुण २९ कर्मचाऱ्यांची पदे मंजुर केल्या गेली आहे.

मात्र प्रत्येकक्षात येथे केवळ विस कर्मचारी कार्यरत आहे.त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांवर अतीरीक्त कामाचा भार आला आहे.त्यामुळे कामकाजामधे दिरंगाई होत आहे.सदर कार्यालयात नायब तहसीलदारांची चार पदे मंजुर आहे. मात्र केवळ दोन नायब तहसीलदार येथे कार्यरत असुन दोन जागा रक्त आहेत.सहाय्यक महसुल अधिकाऱ्यांची मंजुर संख्या सहा आहे मात्र केवळ पाच अधिकारी कार्यरत असुन एक पद रीक्त आहे.महसूल सहाय्यक पदांची मंजूर संख्या तेरा आहे मात्र प्रत्यक्षात येथेसात कर्मचारी कार्यरत असुन सहा पदे अद्यापही रीक्त आहेत.

पुरवठा शाखेत एक निरीक्षण अधिकारी आहेत मात्र मागील दोन महिन्यांपासून हे अधिकारी वैद्यकीय रजेवर असल्याने हे पद भरलेले असुनही रीक्त असल्यासारखेच आहे.पुरवठा निरीक्षकाचे एकुलते एक पदही रीक्त आहे तर लीपीकाची दोन पदे व शिपायांची दोन पदे रीक्त आहेत. या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांना कामकाज करतांना चागलीच कसरत करावी लागत असल्याने नागरीकांच्या कामात विलंब होतो परीणामी नागरीकांना त्याचा फटका बसत आहे.

भद्रावती तालुका हा राज्यातील सर्वात मोठा तालुका आहे.या तालुक्यात १६२ गावे असुन ३७ साजे आहेत.त्यामुळे येथे पुरेशा कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.नागरीकांची अडचण लक्षात घेता येथे पुरेशे कर्मचारी द्यावेत अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये