ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रील सर्व शेतकऱ्याचे बंद असलेले पाणंद (शिव )रस्ते खुले करा.

ईबादुल हसन सिद्धीकी यांची मागणी

चांदा ब्लास्ट

 प्रत्येक शेतकऱ्याला शेतात जाण्याकरिता पूर्वीपासून पाणंद (शिव)रस्ते आहे.मात्र काही रस्त्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे.तर काही पाणंद रस्त्याची दुर्दशा झाली असल्याने बंद आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याचे बंद असलेले पाणंद(शिव)रस्ते सुरु करावे व ज्या पाणंद रस्त्याची दुर्दशा झाली आहे अशा रस्त्याचे खडीकरण करून रस्ता सुरु करावा.

अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धीकी यांनी मा . मुख्य मंत्री देवेद्र फडणवीस उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री अजीत पवार महसूल मंत्री सार्वजनिक बांध काम मंत्री महाराष्ट्र यांच्या भेट घेउन यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

भारत हा शेतीप्रधान देश असून शेतकरी हा निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी होते.जेव्हा खूप पाऊस पडतो तेव्हा शेतकरी आपल्या शेतात जाऊ शकत नाही कारण महाराष्ट्रातील काही पाणंद रस्ते बंद असून काही रस्त्यावर अतिक्रमण केले आहे.यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होऊन त्यांच्या पदरी शेवटी शेतीचे उत्पन्न सुद्धा येत नाही.

अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात असून त्यापासून त्याची सुटका होणे महत्वाचे आहे.तरी महाराष्ट्रील बंद असलेले, अतिक्रमण केलेले रस्ते खुले करण्यासाठी तहसीलदार यांना निर्देश देण्यात यावे व या शिव रस्त्याचे खडिकरण करण्यात यावे अशी मागणी ईबादुल सिद्धीकी जनहितैषी सामाजिक कार्यकर्ता यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये