डाॅ.मकरंद हजारे एफ एम जी ई परीक्षा उत्तीर्ण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
भारतीय विद्यार्थी विदेशातून एम बी बी एस चे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून जेव्हा परत येतात तेव्हा त्यांना आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा बोर्ड द्वारा आयोजित एफ एम जी ई परीक्षा द्यावी लागते.ही एक कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्र सरकारच्या परीक्षे पैकी एक आहे .ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय त्यांना भारतात कुठेही वैद्यकीय सेवा देता येत नाही.
या परीक्षेत जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालय आवाळपुर, येथे कार्यरत असलेले प्रा विलास हजारे यांचे चिरंजीव डॉ. मकरंद हजारे यांनी त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस चे शिक्षण टेक्सीला अमेरिकन युनिव्हर्सिटी जाॅर्जटाऊन ,साउथ अमेरिका येथून सन 2024 मध्ये पूर्ण केले आणि भारतात परत आल्यानंतर लगेच जानेवारी 2025 मध्ये आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा बोर्ड कडून घेतल्या गेलेल्या एफ एम जी ई.परीक्षेत घवघवीत यश मिळविले . त्याबद्दल डॉ मकरंद चे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे .आता ते विदेशात आणि भारतातील कोणत्याही राज्यात वैद्यकीय सेवा देवू शकतात.
त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेत असताना तेथील नागरिकांना वैद्यकीय कॅम्प मध्ये सेवा दिली. आता मात्र त्यांनी आपल्या भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षण घेवून सेवा देण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यांनी या यशाचे श्रेय आई-वडील, त्यांचे बंधू मिहीर, आजी- आजोबा, गुरूजन, मित्र-मंडळी, आप्तगन, व शुभचिंतक यांना दिलेले आहे.
त्यांच्या आई निलीमा विलास हजारे ह्या सुद्धा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षिका आहेत व लहान बंधू मिहीर सुरत येथील एन आय टी तील बी टेक चा विद्यार्थी आहे. त्यांच्या हातून भविष्यात सर्वोत्तम सेवा व समाजकार्य घडो अशी मनोकामना व्यक्त केली जात आहे.