ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा विकासात थांबणार नाही – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ; पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 शासनाने लोकहिताच्या अनेक महत्वाकांक्षी योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तिर्थदर्शन योजना, वयोश्री योजना, युवाकार्य प्रशिक्षण योजना, बळीराजा योजना, अन्नपूर्णा योजना, मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण योजना, सोयाबिन कापूस अनुदान योजना यासारख्या योजनांचा जिल्ह्यातील असंख्य लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. शिक्षण, आरोग्य, कृषि विकास सर्व सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे व महिला सक्षमीकरण या पंचसुत्रीवर आपल्याला पुढील काळात भरीव कामगीरी करायची आहे. यासाठी आपल्या सर्वांची साथ व सोबत नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे गृह, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते.

जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात पालकमंत्री यांनी ध्वजारोहण केले. जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी 100 दिवसाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम सर्व शासकीय विभागाला दिला आहे. या कार्यक्रमानुसार वर्धा जिल्हा सर्वात पुढे राहील यासाठी आपण सर्व प्रयत्न करु या असे आवाहन त्यांनी केले.

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 30 हजार 724 शेतक-यांना 26 कोटी 14 लाख रुपयाचा निधी वाटप करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत 1 लाख 27 हजार 476 शेतक-यांच्या खात्यावर 25 कोटी 60 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. कापूस व सोयाबिन उत्पादक 1 लाख 4 हजार 492 शेतक-यांना 61 कोटी 76 लाख रुपयाचे अर्थसहाय्य सुध्दा वाटप करण्यात आले आहे.

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यात 3 लाख 13 हजार 406 लाडक्या बहिनींना लाभ देण्यात आला असून सहाव्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहीणीच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. तीर्थदर्शन योजने अंतर्गत 3 हजार 355 अर्ज मंजूर करण्यात आले असून 1 हजार लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे लवकरच पहिल्या टप्प्यातील जेष्ठ नागरिकांना तिर्थ दर्शनाचा लाभ देण्यात येणार आहे. वयोश्री योजने अंतर्गत जिल्ह्यात 9 हजार 599 लाभार्थ्यांच्या खात्यात 3 हजार रुपयाप्रमाणे निधीचे वितरण करण्यात आले असून उर्वरीत निधी देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

स्वामित्व योजनेंतर्गत जिल्ह्यातील गावांचे ड्रोन व्दारे सर्वेकरुन गावठाण, जुने नगर भूमापन गावे, उजाड गावे, पुनर्वसन गावे, नगरपालिका क्षेत्रातील गावे, गावठाण नसलेल्या 660 गावातील 93 हजार 814 मिळकत प्रमाणपत्र तयार करण्यात आले असून 27 हजार 519 प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरीत मिळकत पत्रिकेचे वितरण सुरु आहे. यामुळे नागरिकांना आपल्या जमीनीचे ख-या अर्थाने मालकी हक्क मिळाल्यामुळे जमीन हस्तांतरणाच्या लाभासोबतच विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी फायदा होणार आहे.

 प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजनेंर्गत 44 हजार 745 मंजूर घरकुलापैकी 32 हजार 147 घरकुले पूर्ण झाली आहेत. शिक्षण प्रणालीत आमुलाग्र बदल होत आहेत. सर्वांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शिक्षण प्रणालीतील सुधारणा बाबत शिक्षक व पालकांनी सूचना कराव्यात असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

 सर्व सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनेच्या लाभासोबतच विविध प्रमाणपत्रे एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी वर्धा जिल्ह्यात राबविण्यात येत असलेले “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” सेवा पंधरवडा अभियान आता राज्यभर राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या संख्येने विविध प्रमाणपत्र व दाखल्यांचा विनाविलंब लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस विभागाच्या वतीने वर्धा व हिंगणघाट शहरात 36 ठिकाणी 152 सीसी टीव्ही कॅमेरे कार्यान्वीत करण्यात आले आहेत. नुकतेच याचे लोकापर्ण करण्यात आले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निकाली निघण्यास तसेच गुन्हेगारांना शोधन्यास मदत होणार आहे.

 मागील वर्षी काही भागात झालेल्या अतिवृष्टी व पुरपरिस्थितीत 60 हजार 555 शेतक-यांचे शेतपिकाचे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेतक-यांना 74 कोटी 86 लाख 96 हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात आले आहे. यावर्षी जिल्ह्यातील 50 हजार 753 शेतक-यांना 708 कोटी 41 लाखाचे पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात 2 लाख 38 हजार 942 कुटूंबांपैकी 2 लाख 34 हजार 754 कुटूंबांना घरगुती नळ जोडणी देण्यात आली असून याची टक्केवारी 98 टक्के इतकी आहे. शिक्षण, आरोग्य, कृषि विकास सर्व सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे व महिला सक्षमीकरण या पंचसुत्रीवर आपल्याला पुढील काळात भरीव कामगीरी करायची आहे. यासाठी आपल्या सर्वांची साथ व सोबत नक्कीच मिळेल अशी खात्री त्यांनी दिली.

 सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हा आपल्या विकासाचा मुलमंत्र आहे. याच ध्येयाने आपला जिल्हा विकासाची व प्रगतीची अनेक शिखर पादाक्रांत करेल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “आता महाराष्ट्र थांबणार नाही” या मुख्यमंत्री महोदयांच्या निश्चयाला साथ देत आता “वर्धा जिल्हा विकासात थांबणार नाही” ही ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

 तत्पुार्वी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी पोलीस, गृहरक्षकदल, एनसीसी, स्काऊड गाईड व शालेय विद्यार्थ्यांच्या पथकांनी उत्कृष्टि पथ संचलन केले. याप्रसंगी उत्कृष्ठ कामगिरी करणा-या शासकीय अधिकारी, कर्मचारी, खेळाडू, सामाजिक कायकर्ते यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. माजी सैनिकांच्या वीर माता व वीर पत्नीचा मान्यरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

 कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी तर शालेय सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन संजय सुकळकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये