नववर्षाचे स्वागत शांततेत कराः जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सरत्या वर्षाला निरोप अन् नववर्षाचे स्वागत नागरिकांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच करावे. ३१ डिसेंवरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४९ ठिकाणी नाकाबंदी राहणार असून मद्यपींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नववर्ष साजरे करताना अप्रिय घटना घडू नये यासाठी जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचारी सज्ज असून नियमांचे उल्लंघन तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी दिली.
नववर्षाच्या स्वागतासाठी तसेच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नागरिकांकडून जय्यत तयारी केली जात आहे. अशातच पोलिस विभाग अलर्ट मोडवर आहे.
जिल्ह्यातील ०५ उपविभागीय पोलिस अधिकारी, १३ पोलिस निरीक्षक ७१ पोलिस अधिकारी, ७०० महिला व पुरुष कर्मचारी हे बंदोबस्तावर तैनात राहणार. ५० कर्मचान्यांचे दोन आरसीपी पथक, ०१ क्यू आर टी पथक ४५ कर्मचाऱ्यांचे १ स्ट्रायकिंग फोर्स जिल्ह्यात कुठलीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी सज्ज राहणार आहे.
Drunk & Drive करणाऱ्यांवर कडक कारवाई
जिल्ह्यामध्ये 49 ठिकाणी व प्रत्येक सीमांवर नाकाबंदी राहणार असून सर्व नाकाबंदी दरम्यान प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करून दारू पिऊन वाहन चालवण्यावर ड्रंक अँड ड्राईव्ह नुसार कडक कारवाई करण्याचे सक्त आदेश पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी दिले आहेत. तरी कुणीही दारू पिऊन वाहन चालविणार नाही तसेच कुठल्याही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार नाही व पोलीस प्रशासनास सहाय्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे
हॉटेल, धाब्यावर गैरप्रकार आढळल्यास सक्त कारवाई होणार
जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे, हॉटेल्स, धावे, लॉजेस आदी ठिकाणी पोलिसांची करडी नजर राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, लॉजेस, धावे, प्रवासी निवारे यांची कसून तपासणी केली जात आहे. दारुविक्री तसेच मद्यप्राशन असा कुठलाही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित मालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याच्या सूचनाही त्यांनी सर्व अधिकायांना दिल्या आहेत.
समाजमाध्यमांवर सायबर सेलचा वाँच
नववर्षानिमित सोशल मीडियावर असामाजिक तत्वांच्या हालचालीवर सायबर सेलमार्फत करडी नजर ठेवण्यात येत आहे. आक्षेपार्ह पोस्ट, अफवा पसरविणाया व शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर सत्मक कारवाई करण्यात येणार आहे.
प्रतिबंधक कारवाई बडगा
सन २०२४ मध्ये जिल्ह्यातील कलम ११० जाफी / १२९ (वी एन एस एस) अन्वये ९३० प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या आहे. एम.पी.डी.ए. अंतर्गत १९ प्रस्ताव मंजुर झालेले आहे. तडीपारीच्या १३३ कारवाया करण्यात आल्या आहे.
जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक सीमांवर नाकाबंदी लावण्यात आली असून प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाणार आहे. दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असून, पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. उत्सवादरम्यान कोणत्याही असामाजिक तत्वांकडून त्रास झाल्यास किंवा अशा घटना निदर्शनास आल्यास पोलिस विभागाच्या डायल ११२ क्रमांकावर किंवा नजीकच्या पोलिस ठाण्यांना माहिती देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक अनुराग जैन व अपर पोलीस अधीक्षक डॉ सागर रतनकुमार कवडे यांनी दिली आहे.