शहरातील वस्ती विभागाला जोडणाऱ्या एकमेव गोल पुलिया मार्गचे निराकरण करण्याची मागणी -भाजपा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर
बल्लारपूर :- शहरातील वस्ती विभागाला जोडणारा गोल पुलिया मार्ग रेल्वे चे चौथी रेल्वे लाईन टाकण्यात येत आहे त्या करिता रेल्वे गोल पुलिया चे पूल वाढवण्याचे काम चालू आहे. रेल्वे प्रशासन ने काही दिवस गोल पुलिया चा मार्ग बंद करून धातूर -मातुर काम करून अर्धवट काम करून सोडून दिले.थोड्या पावसातच गोल पुलिया मध्ये पाणी साचून राहते आणि पाणी जमा असल्याने मार्ग बंद पडते आणि वस्ती विभाग व टेकडी विभाग चे येणे -जाणे बंद पडतात दोन्ही बाजूच्या नागरिकांना खुबचं कठीनाचा सामना करावे लागतात.
वस्ती विभागात शाळा, कॉलेज, कोर्ट, नदी, क्षमशाणघाट, कोळसा खदान असे महत्वाचे ठिकाण असल्याने शहरवासियांना गोल पुलिया तुन रोज ये -जा करावे लागतात या बाजूने पण सरकारी दवाखाना, पोलीस स्टेशन, नगर परिषद, जीवन प्राधिकरण, रेल्वे स्टेशन, असे महत्वाचे ठिकाण असल्याने या गोल पुलिया चे निराकरण करून रेल्वे प्रशासन ने लवकरात लवकर गोल पुलिया मध्ये साचलेले पाणी चा योग्य मार्ग काढून द्यावे असे भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले, अन्यथा आंदोलन करावे लागणार. वेळेवरच उपाययोजना करावे काही दिवसा मध्ये पाऊस येणार तर थोड्या पाण्या मधेच गोल पुलिया बंद होतो तर पावसाळ्यात काय होणार, रेल्वे प्रशासन व रेल्वे चे ठेकेदार यांनी लवकरात लवकर उपाय योजना करावी.