Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सीडीसीसी बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेतील लेखी पेपर तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलला

लवकरच शिपाई पदाच्या लेखी परिक्षेची तारीख परिक्षार्थीना दिल्या जाणार., परिक्षार्थीनी गोंधळून जावू नये - राजेश्वर कल्याणकर

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेतील CBT Based Test परीक्षा दिनांक २१ डिसेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे. दिनांक २१ डिसेंबर २०२४ ला पहिल्याच दिवशी सकाळ पाळीतील शिपाई पदाकरीता होणारी लेखी परीक्षा सुरू असताना काही तांत्रिक अडचणींमुळे रद्द करण्यात आलेली आहे. तथा (दि. २१) ला ज्या परीक्षार्थीच्या शिपाई पदाकरीता लेखी परीक्षा होणार होत्या त्या लवकरच घेण्यात येणार आहे. त्याबाबत अद्ययावत सूचना व प्रवेश पत्र बँकेच्या वेबसाईट वर टाकण्यात येणार आहे.

 असे ITI Ltd. (Central Govt. Undertaking) कंपनीने कळविले आहे. परीक्षार्थीनी नोकर भरतीचे वेबसाईट वर जावून दिलेल्या सूचनांची माहिती करुन घ्यावी व दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. सोबतच रद्द झालेल्या शिफ्ट मधील परीक्षाबाबत परीक्षार्थीच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर संबंधित आयटीआय कंपनी पुढील सूचनेचा संदेश देतील. तरी याबाबत बँक प्रशासनातर्फे परीक्षार्थीना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे, असे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी सांगितले आहे.

(दि. २१) ला पहिल्या शिफ्ट मधे शिपाई पदाकरीता होणारी परीक्षा सुरू झाली असता ऐन वेळी तांत्रिक बिघाडामुळे परीक्षार्थी देवू शकले नाही. त्यामुळे दोन्ही शिफ्ट मधील लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. यासाठी बँक प्रशासन कुठेही जवाबदार नाही. हा एक तांत्रिक बिघाडीचा विषय आहे. परीक्षा घेणारी कंपनी सदर विषय हाताळत आहे. यात कुठलाही मानवी हस्तक्षेप नाही. तरी यात तांत्रिक सुधारणा करून पुढील शिफ्ट मधील संपूर्ण परीक्षा प्रक्रिया प्रामाणिकपणे व पारदर्शक पध्दतीने राबविण्यात येईल. परीक्षार्थीनी गोंधळून जावू नये, असेही राजेश्वर कल्याणकर म्हणाले आहेत.

दिनांक २२ व २३ डिसेंबर ला होणाऱ्या सर्व शिफ्ट मधील परीक्षा जैसे थे असतील. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परीक्षार्थीनी अफवांना बळी पडू नये. कोणत्याही खोट्या वृत्ताने गोंधळून जावू नये. भरती प्रक्रिया ही न्यायालयाच्या निर्देशानुसार होत आहे, हे महत्त्वाचे, असेही कल्याणकर म्हणाले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये