ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार माणूस घडविणारे – रमेशजी मंडाळे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

 राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथे महाविद्यालयातील नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत (Best Practis) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची प्रासंगिकता या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना रमेशजी मंडाळे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचार आणि कार्य माणूस घडविणारे असून तुकडोजी महाराजांचे विचार आजही प्रासंगिक आहे.

ग्रामगीतेतील विविध ओव्यांचे संदर्भ देत ग्रामविकास ग्राम उन्नती हीच देशाच्या उन्नतीचा मूलमंत्र असून युवकांनी यावे ज्ञानासाठी निघावे सेवेसाठी हे ब्रीद पाळावे असेही ते म्हणाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऐ. चंद्रमौली होते. विचारमंचावर प्रा.महानंदा भाकरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किरण बोरकर यांनी केले.

संचालन रक्षा कोटगले यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ. रामचंद्र वासेकर यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये