ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
विदर्भातील ४ ऐतिहासिक किल्यांच्या होणाऱ्या जिर्नोव्दारमध्ये बल्हारशाह, चांदागड किल्यांची व बल्हाळशाह राजेंच्या समाधीस्थळाचा सहभाग करा
रोहीत लोनारे, शहर अध्यक्ष, विराआंस युवा आघाडी तथा शहर अध्यक्ष जय विदर्भ पार्टी यांची मागणी
चांदा ब्लास्ट
पर्यटनाच्या दृष्टीकोणातून विदर्भातील ४ किल्यांचा राज्य शासनाने जिर्नोव्दार करण्यासाठी अहवाल मागवीला आहे. त्यात विदर्भ राज्य आंदोलन समिती,युवा आघाडी,बल्हारशाहने शासन निर्णयाचे स्वागत करीत, जुनी मागनी असलेला बल्हारशाह कील्ला व चांदागड (चंद्रपूर) कील्ल्यांसह बल्हाळशाह राजे आत्राम यांच्या समाधी स्थळाचा सुद्धा समावेश करावा अशी मागनी निवेदना मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली आहे.
ऐतिहासीक बल्हारशाह नगरीत स्वतंत्र गोंड साम्राज्याचे राजे विश्वपराक्रमी महाराजा खांडक्या बल्हाळशाह राजे यांच्या राजधानीचा कील्ला आहे. चांदागड म्हणजेच आताचे चंद्रपूर येथे प्राचीन किल्ला बल्हाळशाह राजेने वसवीला आहे. विराआंस युवा आघाडी,बल्हारशाह तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार यांच्या नेतृत्वात मागील २०२० पासुन बल्हाळशाह राजे यांच्या किल्याचे व कपुर पेट्रोलपंप मागील समाधी स्थळाचे पुणर्वसन व संवर्धानाकरीता सातत्याने मागनी सुरू आहे. बल्हारशाह किल्याला २ कोटी निधी येऊन सुद्धा किल्याचे काम अध्याप थोडे सुद्धा झालेले नाही.
विदर्भातील ४ किल्यांचे जिर्नोद्वार केले जात आहेत या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र जुन्या मागनी वर आपन काय विचार केला आहे? असा प्रश्न देखील या निवेदना मार्फत करण्यात आला आहे.
विदर्भातील नगरधन,अंबाडा,मानीकगड,धारणी या किल्यांचे जिर्णोव्दार होईल मात्र बल्हारशाह शहरातील किल्ला व चंद्रपूर शहरातील किल्ला हे अती प्राचीन असुन या गोंडकालीन किल्याचे अध्याप पुणर्वसन झालेले नाही.
पुरातन विभागाच्या नियमानुसार किल्याच्या १०० मीटर परीसरात खोदकाम बांधकाम करने गुन्हा असतांना बल्हाळशाह व चंद्रपूर या दोन्ही किल्यांच्या १०० मीटर आत बांधकाम खोदकाम कसे केल्या गेले परवाणगी कोनी दिली? यावर कार्यवाही का नाही झाली?
चंद्रपुर कील्याच्या आतच संपुर्ण मार्केट,रुग्नालय,घरे,माॅल शासकीय कार्यालय,बॅक इ. कसे वसले यांना परवानगी कुणी दीली? या गोष्टींचा विचार करून जिल्हाचे ऐतिहासीक वैभव वाचवीने गरजेचे आहे. चंद्रपूर जिल्हाचा प्राचीन इतिहास असुन जिल्हाच्या ठिकाणीं एकाही गोंड राजे गोंड महारानींचे स्मारक नाही. १८५७ च्या स्वतंत्र लढ्यातील विर शहीद बाबुराव शेडमाके यांचे सूद्धा स्मारक नाही. दाताळा पुलाला राजमाता हीराई रणींचे नाव देण्याची मागणी केली असताना सुद्धा रामसेतु नाव त्या पुलाला देण्यात आले. ऐतिहासीक वैभव वाचवीन्याच्या द्रुष्टीने हे कीत पत योग्य आहे.
आपण आज पर्यंत चंद्रपूर जिल्हाच ऐतीहासीक वैभव वाचवीण्याकरीता योगदान का नाही दिले? मागील पावसाळ्यात अंचलेश्वर प्रवेश द्वाराचे काही भाग ठासळले तेव्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्थळी पहानी करून संबंधीत विभागाला आदेश का नाही दिले. मुनगंटीवार यांचे घर अंचलेश्वर प्रवेश व्दारा पासुन फार लांब नाही मात्र तेव्हा देखील पाहनी केली गेली नाही.
आता महाराष्ट्र शासना मार्फत विदर्भातील ४ किल्लांचे जिर्णोद्वार केले जात आहे त्यात बल्हारशाह येथील गोंड राजे खांडक्या बल्हाळशाह राजे,निलकंठशाह राजे,हीरातानी राणी यांचे समाधी स्थळ, बल्हारशाह व चंद्रपूर किल्यांचा समावेश करावा व चंद्रपूर जिल्हाचा स्वतंत्र गोंडकालीन प्राचीन इतिहास वाचवीन्याकरीता आपन पुढाकार घेऊन आमच्या मागनीवर विचार करून तात्काळ योग्य निर्णय घ्यावा.
वरील मागणी लवकरात लवकर पुर्ण न झाल्यास जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरापुढे विदर्भ राज्य आंदोलन समिती,युवा आघाडी,बल्हारशाह उपोषन करेल असे शहर अध्यक्ष रोहीत लोनारे यांनी या निवेदनात नमुद केले आहे.
पराग गुंडेवार – तालुका अध्यक्ष विराआंस युवा आघाडी बल्हारशाह तथा गोंडकालीन गड, किल्ले प्रेमी यांची प्रतिक्रीया
जिल्हाचे ऐतीहासीक वैभव वाचाविण्याकरीता आम्ही सतत लढा कायम ठेवू,मी व माझे सहकारी सातत्याने मागीन २०२० पासुन ऐतिहासीक वैभव वाचवीण्याकरीता लढा देत आहोत. तसा आम्ही सातत्याने पाठ पुरावाही करत आहो. आमच्या लढाला काही प्रमाने यश देखील मीळखले २ कीटी नगर परीषद बल्हारशाह ला किल्याच्या पुणर्वसन तथा संवर्धना करीता आले. मात्र ज्या पद्धतीने कामाची गती हवी आहे ती दिसत नाही. काम कासवगतीने सुरु आहे. संबंधीत विभागाच्या नजर अंदाज केल्याने या राजधानीच्या किल्याचे बरेच अवशेष ठासळले आहे. २०२१ मध्ये पावसाळ्यात किल्याचे बुरुजही ठासळले ज्यात किल्याला लागुन असलेल्या घराचे नुकसान देखील झाले होते. आमची मागणी ऐतिहासीक वैभव वाचवीण्याकरीता असुन विदर्भातील जे ४ किल्ले जिर्णोद्वारा करीता निवड केले आहे त्यात आणखी २ किल्ले व १ समधी स्थळाचा समावेश जिल्हाचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे करतील असा आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. ते नक्कीच ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आणुन देतील आणि बल्हारशाह किल्ला, चांदागड किल्ला व बल्हाळशाह राजे आत्राम समाधी स्थळ,बल्हारशाहचा समावेश करतील.