Today's Marketकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृषी विभागाच्या भरारी पथकाची धडक मोहीम

कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामा करिता आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

वृत्तपत्रामध्ये प्रकाशित बातमीच्या अनुषंगाने कृषी विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व पंचायत समिती कोरपना च्या वतीने कोरपना तालुक्यात भरारी पथकाकडून धडक मोहीम राबवून कोरपना तालुक्यातील कृषी केंद्राची कसून तपासणी करण्यात आली व विक्री बंद आदेश देण्यात आले, तुलसी या कंपनीचे बीटी कापूस बियाणे वान कबड्डी व पंगा या कापूस बियाण्याची किंमत(MRP) 853/- रुपये असून यापेक्षा जास्त किमतीने सदर बियाण्याची खरेदी करण्यात येऊ नये, असे आवाहन कृषी विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर च्या वतीने डॉ, सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, वीरेंद्र राजपूत कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, लकेश कटरे मोहीम अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, लक्ष्मी नारायण दोडके जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, विवेक दुबे कृषी अधिकारी पंचायत समिती कोरपना, व आर जी दमाळे तालुका कृषी अधिकारी कोरपना, यांच्यावतीने शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे ,कृषी विकास अधिकारी राजपूत यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की कृषी केंद्र कडून जादा दराने बियाणे विक्री होत असेल तर तात्काळ टोल फ्री नंबर 95 61 0 54 2 29 या नं, संपर्क करावा तसेच तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा तसेच शेतकऱ्यांनी विशिष्ट एकाच कापूस बियाणाचा आग्रह करू नये कृषिक केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध असलेले सर्व कापूस बियाणे हे BG 2 असल्यामुळे जनुकांची टक्केवारी कापूस बियाणाचा मध्ये सारखे असते त्यामुळे शेतकऱ्यांनी विशिष्ट कंपनीच्या एकच कापूस बियाण्याचा आग्रह करू नये असे आवाहन कृषी विभाग मार्फत शेतकऱ्यांना करण्यात आले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये