ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतीकामात वाढलाय ट्रॅक्टरचा वापर

सर्वच कामात ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर वेळ वाचतोय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. चंद्रशेखर प्यारमवार

पूर्वीच्या काळात शेती मशागत करण्यासाठी वर्षभर शेतकऱ्यांकडे सर्वात महत्त्वाचे म्हणजे बैलजोडी होती याच बैलजोडीच्या माध्यमातून शेतकरी वर्षभर शेतात नांगरणी पेरणी त्यानंतर डवरन करत होते जवळपास सर्वच कामे शेतकरी या बैलाच्या साह्याने करत होते आता मात्र आधुनिक युगात शेतीचे सर्व कामे ट्रॅक्टरच्या साह्याने आणि आधुनिक तंत्रज्ञांच्या साह्याने करत आहेत दोन जोडीचे काम एकच ट्रॅक्टर करत असून याच माध्यमातून शेतात पिकांची पेरणी नांगरणी तसेच इतर यंत्राच्या साह्याने फवारणी सुद्धा करीत आहेत आज या सर्वच कामात ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचत आहे कमी वेळात जास्त काम होते तसेच बैलाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना वेळ व कामाला सालगडी मिळत नसल्याने आताही परिस्थिती निर्माण झाली आहे असे अनेक शेतकऱ्यांचे मत या परिसरातील आहे सधन कास्तकार आणि सामान्य कास्तकार आता ट्रॅक्टरचाच वापर करून शेतीची मशागत करतात त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा शिल्लक पडत आहे परंतु विविध काम करताना शेतकऱ्यांना खत बियाणे यांचे किमती खूप वाढलेले आहेत त्यामुळे महागाईच्या काळात शेतकऱ्यांना शेती करणे ही फार कठीण झालेले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये