ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

किरकोळ वादातून युवकाचा खून ; चार आरोपीना अटक

सावली पोलिस स्टेशन अंतर्गत केरोडा येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली तालुक्यातील केरोडा जवळील हेटी येथील समीर हरिदास खंडारे या युवकाचा किरकोळ वादातून खून झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली असून घटनेत सहभागी ४ आरोपी व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

    सावली पोलीस स्टेशन अंतर्गत केरोडा हेटी येथे मंगळवारच्या रात्री ७ वाजताचे दरम्यान गावातील एका किराणा दुकानाजवळ मृतक समीर हरिदास खंडारे याचा गिरीधर वालदे व त्याचा मुलगा अभय वालदे याचेसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. परंतु अभय वालदे याच्या मनात समिरचा काटा काढायचा बेत असल्याने तो व्याहाड खुर्द येथून साईनाथ शेडमाके व पियुष लाटेलवार यांना घेऊन आला.

काही कळण्याच्या आत रात्री ९ वाजता समीरच्या पोटावर व मांडीवर चाकूने वार करून खून केले. ही माहिती गावभर पसरताच नातेवाईकांनी सावली पोलीस स्टेशनला माहिती दिली. सावलीचे ठाणेदार प्रदीप पुल्लुरवार आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला व भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करून चारही आरोपीस अटक केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये