ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहाने दोन पाळीव जनावरांचा मृत्यु

भद्रावती तालुक्यातील मोहबाळा शेतशिवारातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

शेतात पिकांच्या रक्षणासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने तिन म्हशी, तिन गायी व एक कालवड अशा सात जनावरांचा मृत्यु झाल्याची तक्रार जनावरांचे मालक अरुण पंडीले यांनी भद्रावती पोलीस स्टेशनला दिली आहे. मात्र घटनास्थळावर केवळ दोन म्हशी मृत झाल्याचे आढळून आले असुन अन्य जनावरे आढळली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदर घटना तालुक्यातील मोहबाळा शेतशिवारातील एका शेतात घडली. सदर घटनेचा पंचनामा भद्रावती पोलिसांतर्फे करण्यात आला असुन आढळलेल्या दोन मृत जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाची पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तालुक्यातील खापरी येथील अरुण पंडीले यांची जनावरे शेतशिवारात चरत होती. रात्रोला सदर जनावरे घरी आली नसल्याने त्यांनी सदर जनावरांचा शोध घेतला असता दुसऱ्या दिवशी लगतच्या मोहबाळा शेतशिवारातील एका शेतात त्यांच्या दोन म्हशी विजेच्या प्रवाहाने मृत झाल्याच्या आढळून आल्या.

अन्य जनावरांचा पत्ता लागलेला नाही. अरुण पंडीले यांनी भद्रावती पोलीसात आपली सात जनावरे मृत झाल्याची तक्रार दिली. भद्रावती पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता केवळ दोन म्हशी मृत आढळल्या. सदर घटनेची तक्रार पंडीले यांनी विज वितरण कंपणीकडे सुध्दा केली आहे. मृत जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले असुन शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाची पुढील दिशा स्पष्ट होईल.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये