ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ

जि.आरआय.एल. कंपनीवर गुन्हा दाखल ; मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

        राजुरा गोविंदपुर राष्ट्रीय महामार्ग काम जोरात सुरू असून कोरपनालगतच्या कातलाबोडी फाट्याजवळचुकीचे डिव्हायडर बांधकाम केल्यामुळे गेल्यास पाच महिन्यात ९अपघात झाले असून कंपनीच्या सुरक्षा सुविधा व सावधान फलक न लावल्यामुळे रस्त्यावरून अव आगमन करणारे वाहन चुकीच्या रस्त्याने जात असल्यामुळे वेळोवेळी या ठिकाणी कातलाबोडी ट्रनिंग जवळ अपघात वाढ झाली आहे अपघातामुळे निष्पाप ७ जिवाला मुकावे लागले काल रात्रौ ११ वाजता दरम्यान गडचांदूर मार्गाकडून येणारे कायगर वाहन क्र. एम.एच. 3 ४ सि डी ५४ ९६ या वाहनापुढे कोरपना कडून उलट दिशेने येणारे दुचाकी मोटर सायकल वर सवार आमने सामने धडक दिल्यामुळे दोघाचा जागीच मृत्यू झाला.

चारचाकी वाहन चालक यांना धक्का बसल्याने दुखापत झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे मात्र जि आर आय एल कंपनीच्या निष्काळजीमुळे अपघातात वाढ झाली असून सुरक्षेच्या उपाय योजना कंपनी कडून केल्या जात नसल्याने अनेक वाटसरूना जिवाला मुकावे लागत आहे. बांधकाम कपंनीच्या निष्काळजी व दुर्लक्ष झाल्याने कंपनी विरोध गुन्हा दाखल करावा व मृतकाच्या नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी व पोलीसात तक्रार करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये