ताज्या घडामोडी

31मार्च ला सहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लोणार तालुक्यातील हिरडव येथे होणार  

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

मराठी साहित्य मंडळ च्या वतीने सहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना चे आयोजन 31 मार्च ला लोणार तालुक्यातील हिरडव येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी लेखक मा सुरेश लोहार,कराड राहतील, उद्घाटन जेष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर, मुंबई यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे.

मुख्य अतिथी म्हणून मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ रेखा जगणाळे, नागपूर, जेष्ठ कवियत्री ललिता गवांदे,नाशिक, जेष्ठ कवियत्रि रेखा दीक्षित, कोल्हापूर, राहणार आहे, विशेष अतिथी म्हणून डॉ घनश्याम पांचाळ, नांदेड, विनायकराव जाधव,कराड, अँड निता कचवे, अमरावती, निता चिकारे, नागपूर राहतील, सन्माननीय पाहुणे म्हणून सरदार वल्लभभाई पटेल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड भास्करराव सांगळे,सचिव प्रकाश पोफले, राहणार आहे.

सकाळी 7 वाजता ग्रंथदिंडी स्व गोपीनाथ मुंडे चौकातून काढण्यात येणार आहे.उद्घाटन झाल्यानंतर परिसंवाद, चर्चासत्र, कविसंमेलन होणार आहे,या साहित्य संमेलना मध्ये राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पत्रकार भूषण पुरस्कार प्रा अशोक डोईफोडे, देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा,यांना तर समाजभूषण पुरस्कार श्रीमती पूनम राणे, मुंबई, यांना तसेच इतरांना साहित्य भूषण व समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहेत,या साहित्य संमेलना मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये