लेखी आश्वासन दिल्यानंतर कैलास नागरे यांनी उपोषण सोडले
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
खडक पूर्णा धरणातील पाणी नद्यांना जोडून नदीजोड प्रकल्पाची अमलबजावणी त्वरित करावी या मागणीसाठी कैलास नागरे यांनी शिवणी आ र मा ळ येथे 15 डिसेंबर पासुन अन्न त्याग आंदोलन सुरू केले होते,20 डिसेंबर रोजी प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत प्रशासनाच्या वतीने एस डी ओ साहेब, तहसीलदार साहेब,व ठाणेदार साहेब यांनी दिलेले लेखी आश्वासनानंतर तूर्तास उपोषण मांगे घेतले आहे निवेदनतील मागण्यांच्या संदर्भात निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय बैठकीत संबधीत कार्यकारी अभियंता यांच्यासोबत 24 डिसेंबर 2024 रोजी तात्काळ बैठक लावली आहे अंढेरा च्या सरपंच सौ रुपालीताई रामदास राव आंबीलकर यांच्या हस्ते शरबत घेऊन 20 डिसेम्बर ला उपोषण सोडले.
उपोषण सोडते वेळी उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे, तहसिलदार वैशाली डोंगरजाळ,ठाणेदार, परिसरातील पत्रकार,शेतकरी पुरुष, महिला उपस्थित होत्या.