नात्यातील प्रेयसीच्या नकाराने प्रेमवीर खचला
प्रेमदिनाच्या दोन दिवसांपूर्वीच संपविले आयुष्य

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर
सध्या जगात प्रेम सप्ताह सुरू असुन जगभरातील प्रेमी आपल्या प्रिय व्यक्तीस आठवडाभर विविध भेटवस्तू देत असुन आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती करत असतानाच बल्लारपूर येथील एका प्रियकराने नात्यातील प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रेमदिनाच्या दोन दिवसांपूर्वी खचून जाऊन जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड मधे अमित बालाजी चौहान (27) वास्तव्यास होता. त्याचे बऱ्याच काळापासून आपल्या नात्यातील एका युवतिशी प्रेमसंबंध होते मात्र अमित ने तिला लग्नासाठी विचारले असता तिने लग्नाला चक्क नकार दिला. प्रेयसीने अचानक लग्न न करण्याची भूमिका घेऊन लग्नाला नकार दिल्याने खचलेल्या अमितने 12 फेब्रुवारी रोजी कुणालाही न सांगता दुचाकीने बाहेर पडला.
बल्लारपूर ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गोविंद चाटे आपल्या चमू सोबत रात्री दीड वाजता पेट्रोलिंग करीत असताना रस्त्यावर MH15 HF 5409 क्रमांकाची एक दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आली. त्यांनी अधिक माहिती घेतली असता अमित चौहान हा युवक सकाळ पासूनच घरून सदर क्रमांकाची होंडा शाईन दुचाकी घेऊन निघून गेला असल्याचे मृतकाचे काका प्रसाद चौहान यांनी पोलीस स्टेशन ला कळविले होते.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदारांना घेऊन गाडी दाखविली व खात्री पटल्यामुळे संशय आल्याने परिसरात शोध घेतला असता दुचकीपासून जवळपास 50 मीटर चा आत एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत अमित दिसून आला, मृतक आपल्या काकाचा दुकानात टेलरिंग चे काम करीत होता. पुढील तपास ठाणेदार असिफरजा यांचा मार्गदर्शनात गोविंद चाटे करीत आहे