ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली तालुक्यातील अनेक गावे नळाच्या पाण्यापासून वंचित

पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

वैनगंगा नदीवरील टेकाडी ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कवठी,पारडी, चांदापुर, भोवर्ला,चांदली,खेडी या गावांना पाणीपुरवठा केला जातो.ग्रामपंचायतीने नळाचा बिल न भरल्याने मागील एक महिन्यापासून अनेक गावातील पाणीपुरवठा बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

शासन *हर घर जल,हर घर नल*अभियानाअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला मोफत नळ जोडणी आणि पाणी पुरविण्याचा संकल्प केला आहे मात्र या ठिकाणी ग्रामपंचायतीने नळाचा बिल भरणा न केल्याने उपरोक्त ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पा वंचित रहावे लागत आहे.ही गंभीर बाब आहे.कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा ग्रामपंचायतीला पत्र न देता नळाचे वीज कपात करण्यात आल्याने नेमके कोणत्या कारणामुळे पाणी पुरवठा बंद करण्यात आला याबाबत ग्रामपंचायतीला संभ्रम निर्माण झाला आहे.ग्रामपंचायतीने वीज बिल भरणा करून पाणी योजना पूर्ववत करावी आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येपासून मुक्त करावे अशी नागरिकांची मागणी आहे.

खेडी येथील ग्रामीण पाणी पुरवठ्याचे काम मागील एक वर्षापासून सुरू असून अजून पर्यंत पूर्णत्वास आलेला नाही.त्यामुळे खेडीतील रहिवाशी शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये